Sunday, April 19, 2026
Homeभंडारारस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या ३ वर्षीय बालकास आरटीओ वाहनाची धडक; बालक ठार

रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या ३ वर्षीय बालकास आरटीओ वाहनाची धडक; बालक ठार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-आरटीओ वाहनाच्या धडकेत ३ वर्षाय बालक ठार झाल्याची घटना काल,मंगळवारी ९ ऑक्टोंबरच्या सायंकाळी ७ च्या सुमारास भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खरबी नाका येथील वंजारी राईस मिल समोर घडली.पूर्वांश रामकृष्ण वंजारी वय ३ वर्षे रा.खरबी नाका, ता.जि.भंडारा असे ठार झालेल्या बालकाचे नाव आहे.
जवाहरनगर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका ट्रकमध्ये रेती ओव्हरलोड असल्याचा संशयावरून ट्रकला वजन काटा करण्यासाठी खरबी येथील राईस मिल वर घेऊन जात होते.भंडारा आरटीओ विभागाचे चारचाकी स्कॉर्पिओ क्रमांक-एमएच ०४ केआर ६४३६ चे वाहन पुढे जात होते.राईस मिलच्या समोरच रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या पूर्वांश रामकृष्ण वंजारी याला धडक लागली.धडकेत तो रस्त्याचा कडेला पडल्याने गंभीर दुखापत झाली.उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.सदरच्या घटनेने नागरिकांनी रोष व्यक्त केला.जवाहर नगर पोलिसांनी भंडारा परिवहन विभागाच्या आरटीओ वाहन चालक काशीद मिर्झा याचेवर भारतीय न्याय संहिता कलम १०६,२८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम राठोड सह पोलीस कर्मचारी संदीप बंबावले करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!