उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून निश्चित करण्यात आल्याने त्यानंतर तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी रेशन दुकानात जाणाऱ्या लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. यावर्षी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तीन महिन्यांचे धान्य एकत्र देण्याची शासनाची योजना होती.दरम्यान,येत्या, सोमवार १५ जूनपर्यंतच लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्याच्या सूचना स्वस्त धान्य दुकानदारांना पुरवठा विभागाने दिल्या आहेत.त्यानुसार रेशन दुकानदार लाभार्थ्यांना रेशन वितरित करीत आहेत.विशेष म्हणजे, ज्या ई-पॉस मशीनद्वारे(थंब इंप्रेशन प्रणाली)धान्य वितरण केले जाते,त्या प्रणालीमध्ये १५ जूननंतर संबंधित नोंदी बंद होणार आहेत.त्यानंतर,रेशन दुकानातून धान्य देणे बंद होणार असल्याने लाभार्थ्यांनी तात्काळ तांदूळ,गहू व इतर धान्य घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

