- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील खैरी/पट येथील शेतकऱ्यास वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना काल,रविवार ३० मार्च रोजी घडली असून आज,सोमवार ३१ मार्च रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.खैरी/पट येथील ४० वर्षीय
शेतकरी डाकराम गोपीचंद देशमुख हे त्यांच्या मालकी शेत शिवारातील शेतात काल,रविवारी सायंकाळच्या सुमारास मोटार पंपाद्वारे पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते.अशातच दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानकपणे हल्ला करून ठार केले आहे.
माहितीनुसार,डाकराम देशमुख यांनी त्यांच्या मालकी शेतात मका पिकाची लागवड केली आहे.अशातच शेतकरी डाकराम हे शेतात लागवड केलेल्या मका पिकांना कृषी पंपाद्वारे काल,रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास पाणी देण्यासाठी गेले असता रात्र होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी चिंता व्यक्त करीत गावकरी तसेच वन विभागाचे कर्मचाऱ्यांसह शोधाशोध केली.रात्रीच्या सुमारास डाकराम यांचा शोध न लागल्याने परत पुन्हा आज,सोमवारी सकाळच्या सुमारास शोधाशोध केली असता डाकराम यांचा मृतदेह शेतातील मक्याच्या पिकात आढळून आला.घटनास्थळी शेतकऱ्याच्या पोटा खालील भाग अर्धवट खाल्लेला दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान,गेल्या १५ ते २० दिवसांपासून खैरी/पट,विहीरगाव,डांबेविरली व टेंभरी गाव परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन होत असून,वाघाने अनेक जनावरांची शिकार केल्याने पीडित शेतकऱ्याची वाघानेच शिकार केल्याचा संशय व्यक्त करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
- Advertisement -

