- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-जिल्ह्याच्या पारशीवनी तालुक्यातील कन्हान नगर परिषद हद्दीच्या तुकाराम नगर नजीकच्या रेल्वे स्टेशन परिसरातील ट्रॅकवर तब्बल सहा हरीण मृतावस्थेत आढळून आल्याची घटना आज,शनिवार १८ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.अन्न आणि पाण्याच्या शोधात रेल्वे रुळ ओलांडत असतांना रेल्वेच्या धडकेत तब्बल सहा हरणांच्या कळपाचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच वन विभाग,रेल्वेचे अधिकारी,कर्मचारी आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.अधिकाऱ्यांनी मृत हरणांचा रीतसर पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली.
हरीण नेमके कोणत्या जंगलातून शहराच्या हद्दीत
आणि रेल्वे रुळापर्यंत पोहोचले,याचा तपास सध्या
वन विभागाकडून केला जात आहे.विशेष म्हणजे,
कन्हान रेल्वे जंक्शनला लागूनच कांद्री-मनसर आणि कामठी वनपरिक्षेत्राचे झुडुपी व राखीव जंगल आहे. सदरचा परिसर रामटेक वनपरिक्षेत्र आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनला जोडलेला आहे.कन्हान नदीच्या खोऱ्यामुळे प्राण्यांना पाणी आणि अन्नासाठी हा एक नैसर्गिक मार्ग मिळतो.कामठी प्रादेशिक वनपरिक्षेत्रात येणाऱ्या या भागात झुडुपी जंगल असल्याने हरणांचा नेहमी वावर असतो.त्यातूनच रेल्वे रूळ ओलांडत असतांनाच हरणांचा कळप रेल्वेला धडकलेला असावा आणि सदरची घटना घडली असावी, असा कयास बांधला जातो आहे.याबाबत अधिकचा तपास सुरू आहे.
- Advertisement -

