- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील अंत्योदय अन्न योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल २४ लाख ५८ हजार कुटुंबातील महिलांना दरवर्षी दिवाळीच्या सणात मोफत दिली जाणारी साडी यंदाच्या दिवाळीत मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.याचे कारण म्हणजे,राज्याच्या तिजोरीवरील वाढत्या आर्थिक ताणामुळे मोफत साडी योजना बंद करण्यात आल्याचे वस्त्रोद्योग विभागाने स्पष्ट केले आहे.या संदर्भात वस्त्रोद्योग विभागाने १६ जुलै २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून २०२३ मध्ये अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातल्या महिलांना दरवर्षी मोफत साडी देण्याची योजना सुरू केली होती.त्यानुसार,शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी दरवर्षी एक मोफत साडी मिळायची.गेल्या तीन वर्षात म्हणजेच २०२३,२०२४ व २०२५ मध्ये योजनेअंतर्गत महिलांना साड्यांचे यशस्वी वितरण करण्यात आले होते. योजनेसाठी सरकारकडून दरवर्षी शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.मात्र, राज्यावरील वाढता आर्थिक बोजा आणि बदलत्या शासकीय प्राधान्यक्रमांमुळे ही योजना बंद करण्यात आली आहे.या निर्णयामुळे चालू वर्षाच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या दिवाळीत अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना शासनाकडून मोफत साडी मिळणार नाही.याशिवाय, सर्वाधिक फटका स्थानिक यंत्रमाग क्षेत्राला बसणार आहे.विशेषतः महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळामार्फत विणकरांकडून या साड्यांची थेट खरेदी केली जात होती, ज्यामुळे हजारो विणकरांच्या हाताला काम मिळत होते. आता योजनाच बंद झाल्याने कुठली साडी अन् कुठले काम,अशी अवस्था निर्माण झाली आहे.
- Advertisement -

