उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था “ना घर के ना घाट के” अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक असायचे. पण,आता वर्गात विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे देण्यापेक्षा सकाळपासून संध्याकाळपर्यंत बीएलओची मतदारयादी, एसआयआर,यू-डाएस प्लस,जनगणना,विविध सर्वेक्षण, शिष्यवृत्ती,पोषण आहाराचा हिशोब व इतर विविध जबाबदारीचे ओझे लादण्यात आल्याने शिक्षकांकडून गुणवत्तेची अपेक्षा केली जाते.तेही मनुष्य प्राणीच आहेत.डोक्याच्यावर पाणी गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार.एकीकडे मोठा गाजावाजा करून शाळा प्रवेशोत्सव करायचा आणि विद्यार्थी गुणवत्तेची बोंबाबोंब करून शिक्षणाचे ढोल पिटायचे.गुणवत्ता वाढवणाऱ्या शिक्षकाला वर्गात शिकवू तर द्या नं..! अशी म्हणण्याची वेळ आली आहे.सध्या स्थितीत शिक्षक एकंदरीत शिकविण्यापेक्षा इतर कारकुनी कामात अडकले आहेत. अश्यातच सतत मोबाइलवर तात्काळ माहिती देण्याचा संदेश येतो,अनेकदा सर्व्हर डाऊन असतो,शाळेत नेटवर्क मिळत नाही.डेटा वेळेवर गेला नाही की गुणवत्ता ढासळली म्हणून जाब विचारला जातो.शिक्षकांना एसआयआरचे काम करण्यासाठी आधी सकाळी साडे आठ ते अडीच वाजे शाळांची वेळ करण्यात आली. आता १५ ते २९ जुलैदरम्यान सकाळी साडे सात ते साडे बारा वाजेची वेळ बदलली,मात्र शिक्षकाकडून बीएलओ कामे कमी न करता ‘जैसे थे’ ठेवले आहे.त्यामुळे केवळ शाळांची वेळ बदलून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार कां? असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यातच,एसीच्या केबिनमध्ये बसून गुणवत्तेचे धोरण ठरवणाऱ्यांना मैदानावरचा शिक्षक किती तारेवरची कसरत करतोय हे दिसणार तरी कधी?असा विचार अनेक शिक्षकांच्या मनात घर करून सोडतो आहे.
गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

