- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-ठाणे जिल्ह्याच्या कल्याण-डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉ.सृष्टी बाविस्कर आणि डॉ.वैभव साळुंखे यांना झालेल्या कथित मारहाणीनंतर देशभरातील डॉक्टर्स, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.डॉक्टरांवरील हल्ले आता कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत,अशी भूमिका घेत हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)महाराष्ट्र राज्य शाखेने राज्यव्यापी बंदची घोषणा केली आहे.येत्या,सोमवार २० जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपासून ते मंगळवार,२१ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत,असे २४ तास राज्यातील सर्व नियमित आरोग्य सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनाला ॲलोपॅथी,आयुर्वेद,होमिओपॅथी या सर्व वैद्यकीय शाखांचे डॉक्टर,परिचारिका संघटना आणि पॅरामेडिकल स्टाफ पाठिंबा देणार आहेत.या २४ तासांच्या बंद दरम्यान,सर्व रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग(ओपीडी)आणि नियोजित शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद राहतील.मात्र,सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आपत्कालीन सेवा,अतिदक्षता विभाग (आयसीयू),प्रसूती सेवा आणि जीवनावश्यक उपचार कोणत्याही अडथळ्याविना अविरत सुरू राहतील,असे ‘आयएमए’ने स्पष्ट केले आहे.हे आंदोलन कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून,डॉक्टरांना सुरक्षित आणि निर्भय वातावरण मिळावे यासाठीचा लढा असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
- Advertisement -

