- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या विविध भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे गोसीखुर्द धरण जलाशयाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.पाण्याचा वाढता साठा लक्षात घेता प्रशासनाने धरणातील पाणी पातळी नियंत्रित राहावी यासाठी मोठा निर्णय घेत आज,शनिवार ४ जुलै रोजी सकाळच्या सुमारास गोसीखुर्द धरणाचे ३३ पैकी ३३ दरवाजे अर्धा मिटरने उघडण्यात आले.यामुळे वैनगंगा नदीच्या मुख्य प्रवाहात ३,७०६.९८ क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.वैनगंगा नदीला येणारा संभाव्य पूर आणि पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता,नदीकिनारी राहणाऱ्या आणि संभाव्य बाधित भागांमधील नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षिततेचा आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.भंडारा जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सरासरी २६.३ मिमी पावसाची नोंद झाली असून संपूर्ण जिल्ह्यात पाऊस सक्रिय असला,तरी या कालावधीत जिल्ह्याच्या अड्याळ आणि सिहोरा या दोन प्रमुख विभागांमध्ये सर्वाधिक मुसळधार पाऊस कोसळला आहे.अश्यातच हवामान खात्याकडून पुढील चार दिवस विदर्भात धो- धो पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -

