Tuesday, April 28, 2026
Homeभंडारादुपारची दुर्दैवी घटना; मुलीच्या लग्न मंडपातच वडिलांचा मृत्यू...

दुपारची दुर्दैवी घटना; मुलीच्या लग्न मंडपातच वडिलांचा मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-मुलीचे लग्न समारंभ आटोपले आणि सनई चौघडा व ढोल ताशांचा गजर सुरू असतांनाच लग्न मंडपातच वडिलांना छातीत अचानक दुखू लागल्याने खाली कोसळले.त्यातच त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील झारली गावात आज,मंगळवार २९ एप्रिलला दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.ऐन मुलीच्या लग्न मंडपातच वडिलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शांतता पसरली.गणेश खरवडे वय ५४ वर्षे असे मृत मुलीच्या वडिलांचे नाव आहे.
गणेश खरवडे यांची मुलगी पल्लवी हीचा मोठ्या थाटामाटात आज मंगळवारी दुपारच्या सुमारास लग्न सोहळा पार पडला.सनई चौघडा व ढोल ताशांचा गजर सुरू होता.वऱ्हाडी पाहुणे मंडळींची जेवणासाठी अंगत-पंगत सुरू झाली.वडील लग्न मंडपात देखरेख करीत होते.अशातच त्यांच्या छातीत दुखू लागले व ते खाली कोसळले.खाली कोसळताच नातेवाईकांनी धाव घेतली. तोपर्यंत वडिलांची प्राणज्योत मावळली.घटनेने संपूर्ण पावणे मंडळी व गावकरी सुन्न झाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

घर बांधणे झाले महाग; लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाडले..

उद्रेक न्युज वृत्त :-बांधकाम साहित्यांच्या वाढत्या किमतींमुळे लोकांच्या बजेटवर मोठा ताण आल्याचे चित्र आहे.यामुळे सर्वसामान्यांना घर बांधणे कठीण झाले आहे.लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाळल्याने...

खेळता-खेळता सांडपाण्याच्या खड्यात पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खेळत असतांनाच घरालगत असलेल्या सांडपाण्याच्या खड्यात पडून ३ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील शिक्षक...

कारखान्यात आढळून आले बालकामगार; संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा...

आता लग्न पत्रिकेवर टाकावी लागणार जन्मतारीख..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अजूनही विशेषतः ग्रामीण आणि काही दुर्गम भागात छुप्या पद्धतीने बालविवाह लावले जातात.अनेकदा मुलगी अल्पवयीन असतांनाही तिचे लग्न लावून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!