Monday, July 27, 2026
Homeवर्धावाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात 'हाय अलर्ट'..

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.त्यात वाठोडा,धामणगाव,आमला,वाघधरा,बेलगाव, झाडगाव,लोणसावळी,शेकापूर,जोगाधरी आणि वायफड या गावांचा समावेश आहे.या गावांमध्ये वाघाचा सततचा वावर असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही जिकिरीचे झाले आहे.खबरदारीचा उपाय म्हणून वाघाच्या सुरक्षिततेसाठी आणि परिसरातील नागरिकांच्या संरक्षणासाठी प्रादेशिक वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दिवस-रात्र परिसरातील जंगल पिंजून काढत आहेत.अत्याधुनिक यंत्रणेद्वारे आणि प्रत्यक्ष गस्तीव्दारे वाघाच्या प्रत्येक हालचालीवर अत्यंत बारीक लक्ष ठेवले जात असून नागरिकांनी विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या वेळेस शेतात जाणे टाळावे,जंगल परिसरात तसेच शेतात जातांना एकटे जाणे टाळून नेहमी समूहाने जावे,जनावरांच्या गोठ्यांची आणि घरांच्या आसपास विशेष काळजी घ्यावी; असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!