Sunday, September 20, 2026
Homeवर्धाबापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीस तपासून मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना दिली.डॉक्टरांच्या शब्दावर विश्वास ठेवून अत्यंत दुःखी अंतःकरणाने कुटुंबीयांनी मृतदेह घरी नेला.निधनाची बातमी समजताच नातेवाईक आणि मित्र परिवाराने त्यांच्या घरी गर्दी केली.अश्यातच घरी अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच सकाळी साडेआठच्या सुमारास ज्याला मृत घोषित केले अश्या व्यक्तीने अचानकपणे डोळे उघडले आणि क्षणात त्यांचा श्वास सुरू झाला.मृत घोषित केलेला माणूस जिवंत झाल्याचे पाहून कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही.या दरम्यान उपस्थित नागरिकही अवाक् झाले. कुटुंबीयांनी कोणतीही वेळ न घालवता त्या व्यक्तीस
पुन्हा तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले.परंतु,डॉक्टरांनी पुन्हा तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.यानंतर मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले आणि सायंकाळची त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.सदरची अचंभित करणारी घटना वर्धा जिल्ह्याच्या आर्वी शहरातील विठ्ठल वॉर्डात घडली असून मनोज उत्तमराव बोरकर वय ४० वर्षे,रा.विठ्ठल वॉर्ड, आर्वी,ता.आर्वी,जि.वर्धा असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.मनोज हे आर्वी शहरातील ताज बेकरी येथे काम करत होते. त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने आर्वी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.मात्र,मृत्यूच्या दाढेतून परत आलेले मनोज बोरकर पुन्हा निघून गेल्याने परिसरात काहीकाळ मोठी खळबळ उडाली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

आता शेतकऱ्यांना मोबाइल ॲपद्वारेही करता येणार ई-पीक पाहणी नोंदणी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाकडून महसूल विभागातील सहाय्यकांकडून ११ ऑगस्ट २०२६ पासून खरीप ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे.मात्र,काही तांत्रिक समस्येमुळे पीक पाहणीची प्रक्रिया अतिशय...

उद्याला गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाची खरीप शिवार फेरी.. – एकाच ठिकाणी २२८ पीक वाण व तंत्रज्ञान शिफारशींची प्रात्यक्षिके व शास्त्रज्ञांशी थेट संवादाची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला,कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने २० सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२६...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!