Wednesday, August 5, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरसंबंधीच्या नियमांत बदल केले आहेत.त्यानुसार, चालू ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे बंधनकारक केले आहे.ज्या ग्राहकांनी आधारप्रमाणीकरण केलेले नाही,अशा सिलिंडरधारकांची जोडणी रद्द करण्यात येणार आहे. ग्राहकांना संबंधित गॅस एजन्सी किंवा कंपन्यांच्या ॲपद्वारे केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
इंडेन,एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांनी ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल,तर त्यांना सबसिडी मिळण्यात अडथळा येईल आणि त्यांचे गॅस कनेक्शनही काही दिवसांसाठी बंद केले जाऊ शकते.अधिकृत मोबाइल ॲपच्या मदतीने फेस-ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकेल.त्याचबरोबर,चालू ऑगस्ट महिन्यापासून पासून घरपोच गॅस सिलेंडर डिलिव्हरीचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.आता ग्राहकांद्वारे सिलिंडर बुकिंग केल्यानंतर त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक वन-टाइम पासवर्ड पाठवला जाईल. पासवर्डचा हा संदेश डिलिव्हरी बॉयला दाखवणे अनिवार्य आहे.गॅसचा पुरवठा कुठे-कुठे करण्यात आला,याची अपडेट एजन्सी व कंपन्यांना द्यावी लागणार आहे.ज्या गॅसधारक ग्राहकांनी अद्यापही ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही; अशांनी तात्काळ   ई-केवायसी करून घ्यावी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

गडचिरोली जिल्ह्याला ४८ आधार नोंदणी संच प्राप्त; इच्छुक सेवा केंद्र चालकांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात आधार नोंदणी व बायोमेट्रिक अद्ययावतीकरणाच्या सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र...

आता “पोलीस पाटी” अथवा “पोलीस” नाव लिहिलेल्या खासगी वाहनांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील बरेचसे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या खासगी दुचाकी वा चारचाकी वाहनांवर 'पोलीस' असे लाल अक्षरात लिहिणे किंवा तशी पाटी लावून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!