Tuesday, July 14, 2026
Homeवर्धाआंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा नदीत बुडून मृत्यू..

आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा नदीत बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील वणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, शुक्रवार २९ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. मृतांमध्ये अतुल लक्षमन किनकर वय ४५ वर्षे,त्यांची १६ वर्षीय मुलगी रिद्धिमा अतुल किनकर व मुलीची मैत्रीण गुंजन रमेश मेश्राम वय १६ वर्षे सर्व रा.शेडगाव,ता.समुद्रपूर, जि.वर्धा अशी मृतकांची नावे आहेत.तिघेही अधिक मासानिमित्त नदी तीरावर आंघोळीसाठी गेले असता सदरची दुर्दैवी घटना घडली.नदीत आंघोळ करत असतांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले.सदरची माहिती गावात कळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली.दरम्यान,पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.यावेळी शोध मोहीम राबवण्यात आली.काही वेळाने तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.घटनास्थळी एसडीएम आकाश अवथरे, तसीलदार कपिल हाटकर,एसडीपीओ सुशिलकुमार नायर,पीआय अनिल ठाकूर,समुद्रपूरचे ठाणेदार रवींद्र रेवतकर,गिरडचे ठाणेदार विकास गायकवाड यांनी भेट दिली.तिन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरिता हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!