Friday, May 29, 2026
Homeवर्धाआंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा नदीत बुडून मृत्यू..

आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा नदीत बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील वणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, शुक्रवार २९ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. मृतांमध्ये अतुल लक्षमन किनकर वय ४५ वर्षे,त्यांची १६ वर्षीय मुलगी रिद्धिमा अतुल किनकर व मुलीची मैत्रीण गुंजन रमेश मेश्राम वय १६ वर्षे सर्व रा.शेडगाव,ता.समुद्रपूर, जि.वर्धा अशी मृतकांची नावे आहेत.तिघेही अधिक मासानिमित्त नदी तीरावर आंघोळीसाठी गेले असता सदरची दुर्दैवी घटना घडली.नदीत आंघोळ करत असतांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले.सदरची माहिती गावात कळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली.दरम्यान,पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.यावेळी शोध मोहीम राबवण्यात आली.काही वेळाने तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.घटनास्थळी एसडीएम आकाश अवथरे, तसीलदार कपिल हाटकर,एसडीपीओ सुशिलकुमार नायर,पीआय अनिल ठाकूर,समुद्रपूरचे ठाणेदार रवींद्र रेवतकर,गिरडचे ठाणेदार विकास गायकवाड यांनी भेट दिली.तिन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरिता हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरुडच्या बोडेगाव रेती घाटात अवैध उत्खनन जोमात; देसाईगंज महसूल विभाग कोमात..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शासनाने रेतीघाट लिलाव केलेय खरी,पण अवैधरित्या वाळूची चोरी करणाऱ्या चोरट्यांपेक्षा काही रेतीघाटधारकच महाचोरटे असल्याचा प्रकार आज,शुक्रवार २९ मे रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या...

अत्यंत कठीण परिस्थितीतही आम्ही प्रामाणिकपणे आरोग्य सेवा दिली; मात्र आता मानधनाशिवाय सेवा देणे अशक्य झाले आहे.. – पेसा बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)पेसा पदभरतीमधील मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत बिनपगारी कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला...

साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा.. – तुमच्या परवानगीशिवाय मिटर बदलताच येत नाही..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात वीज वितरण कंपनीने मागील काही महिन्यांपासून साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा सुरू केला आहे.मात्र,वीज वितरण...

गडचिरोलीतील १२० विद्यार्थी दिल्लीकडे रवाना..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसह त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि राष्ट्रीय स्तरावरील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!