Friday, May 22, 2026
Homeवर्धाअज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने धडकेत दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट नजीक महामार्गावरील हॉटेल सगुना कारखान्याजवळ घडली.मृतांमध्ये पती,पत्नी आणि त्यांच्या अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. गजानन वानखेडे वय ४५ वर्षे,पल्लवी गजानन वानखेडे वय ३८ वर्षे व आरोही वानखेडे वय ६ वर्षे अशी मृतकांची नावे असून वानखेडे कुटूंबीय वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील कुर्ला येथील रहिवासी होते.
वानखेडे कुटूंबीय आज सकाळच्या सुमारास एमएच ३२ एएम १६९४ क्रमांकाच्या मोपेड स्कूटीने हिंगणघाट शहराकडे कपडे खरेदी करण्यासाठी निघाले होते. दरम्यान,राष्ट्रीय महामार्गावरून जात असतांनाच हॉटेल सगुना कारखान्याजवळ विरुद्ध दिशेने अत्यंत भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की,दुचाकी चक्काचूर तर झालीच,पण दुचाकीवरील गजानन,पल्लवी व चिमुकली आरोही हे तिघेही रस्त्यावर दूरवर फेकले गेले.तिघांनाही गंभीर मार लागल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला.अपघात घडताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तात्काळ रुग्णवाहिका बोलवून तिघांनाही उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.मात्र,रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी अंती तिघांनाही मृत घोषित केले. अपघातात मृत पावलेली चिमुकली आरोही ही जुळी बहीण होती.दुसरी जुळी बहीण घरीच राहिल्याने ती बचावली.मात्र,अख्खे कुटुंबच अपघातात मृत पावल्याने आई-वडिलांविना ती पोरकी झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

जंगल परिसरात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाचा हल्ला; चार महिलांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात एक भयंकर घटना आज,शुक्रवार २२ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली असून तेंदूपाने तोडण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या महिलांवर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!