- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.राजेंद्र तिमाजी भोयर वय ५० वर्षे,रा.नवेगाव (पुनर्वसन)असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
राजेंद्र भोयर हे काल सोमवारी ६ जुलै रोजी सकाळच्या सुमारास बरडघाट येथील आपल्या चुलत भावाच्या शेतावर कामासाठी गेले होते.सोयाबीन व कापूस पिकांचे वन्यप्राण्यांपासून बचाव व्हावा,यासाठी ते शेताला कुंपण घालत होते.शेताला कुंपण घालत असतांनाच दुपारच्या सुमारास शेतालगतच्या जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला.यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर वनविभाग व पोलिस अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली.राजेंद्र भोयर यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले असा परिवार असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे.
- Advertisement -

