Sunday, April 19, 2026
Homeचंद्रपूर१३ वर्षीय शाळकरी मुलगा डोळ्या देखत पूराच्या पाण्यात वाहून गेला…

१३ वर्षीय शाळकरी मुलगा डोळ्या देखत पूराच्या पाण्यात वाहून गेला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-जिल्ह्यातील नागभीड तालुक्यामध्ये थरारक घटना घडली असून एक १३ वर्षाचा मुलगा डोळ्या देखत पूराच्या पाण्यात वाहून गेला.चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे नदी नाले तुडूंब भरून वाहत असून बरेच पुल पाण्याखाली गेले आहेत. नागभीड तालुक्यात विलम या गावामध्ये पूर आला होता.पूर पाहण्यासाठी रुणाल बावणे वय १३ वर्षे हा गावकऱ्यांसोबत नाल्यावरील पूलाकडे गेला होता. यावेळी पूल ओलांडताना त्याचा तोल गेला आणि तो पाण्याच्या प्रवाहात गावकऱ्यांच्या डोळ्या देखत वाहून गेला.यावेळी गावकरी मोठ्या संख्येने त्याठिकाणी उपस्थित होते.पाण्याचा वेग पाहता पाण्यात उडी मारण्याचे कोणीही धाडस केले नाही.गावातील काही तरुणांनी पाण्यात उडी मारून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला,पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. घटनेची माहिती नागभीड पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होऊन शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!