Sunday, April 19, 2026
Homeचंद्रपूरआत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली.
अनिकेत यशवंत गावंडे,तेजस संजय ठाकरे,जनक किशोर गावंडे,यश किशोर गावंडे,तेजस बालाजी गावंडे सर्व राहणार साटगाव कोलारी,ता.चिमूर, जि.चंद्रपूर अशी तलावात बुडून मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत.सर्व मुले १८ ते २२ वर्षे वयोगटातील आहेत.यातील दोन सख्खे भाऊ असून दोन चुलत भाऊ व एका मित्राचा समावेश आहे.१६ वर्षीय आर्यन हेमराज हिंगोली थोडक्यात बचावला.
घोडाझरी या ठिकाणी ब्रिटिश कालीन तलाव आहे. तलाव व पर्यटनस्थळ असल्यामुळे येथे बारमाही पर्यटकांची गर्दी असते.शनिवार आणि रविवारी तलावावर बाहेरून पर्यटक येतात.आज शनिवारी चिमूर तालुक्यातील साटगाव कोलारी येथील अनिकेत यशवंत गावंडे,तेजस संजय ठाकरे,जनक किशोर गावंडे,यश किशोर गावंडे,तेजस बालाजी गावंडे व आर्यन हेमराज हिंगोली ही सहा मुले पर्यटनासाठी गेली होती.दुपारपासून त्यांनी घोडाझरी तलावावरील पर्यटनाचा आनंद घेतला.त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी असलेल्या परिसरात सहा मुले पोहण्याकरिता तलावात उतरली.पाण्याची पातळी खोल गेल्याने आणि या परिसरात डोह असल्यामुळे सहाही जण डोहामध्ये बुडाले.अनिकेत यशवंत गावंडे,तेजस संजय ठाकरे,जनक किशोर गावंडे,यश किशोर गावंडे,तेजस बालाजी गावंडे हे पाचही जण बुडाले तर आर्यन हेमराज हिंगोली पाण्यातून बाहेर आला.तलावातून वाचून बाहेर आलेल्या मुलाने ही घटना घटनास्थळी असलेल्या नागरिकांना सांगितली.त्यानंतर अवघ्या काही वेळातच नागभीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पाचही मुले तलावातच बुडालेली होती.अशातच शोध मोहीम राबविल्या नंतर पाचही जणांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले असून सदर घटनेची माहिती मुलांच्या कुटुंबीयांना साटगाव कोलारी येथे देण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!