Tuesday, July 7, 2026
Homeचंद्रपूरजंगल परिसरात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाचा हल्ला; चार महिलांचा मृत्यू..

जंगल परिसरात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाचा हल्ला; चार महिलांचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात एक भयंकर घटना आज,शुक्रवार २२ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली असून तेंदूपाने तोडण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला चढवून तब्बल चार महिलांना ठार केले आहे.सदरची घटना सिंदेवाही तालुक्याच्या गुंजेवाही जंगल परिसरात घडली.वाघाच्या हल्ल्यात संगीता संतोष चौधरी वय ३६ वर्षे,सुनीता कौशिक मोहुर्ले वय ३३ वर्षे,कवडूबाई दादाची मोहुर्ले वय ४५ वर्षे व अनुबाई दादाजी मोहुर्ले वय ४६ वर्षे अशी मृतक महिलांची नावे आहेत.विशेष म्हणजे,मागील वर्षाच्या १० मे २०२५ रोजी सिंदेवाही तालुक्यातीलच मेंढा(माल)येथील जंगल परिसरात वाघाने तब्बल तीन महिलांचा बळी गेला होता.त्यानंतरची ही दुसरी मोठी घटना आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास
गुंजेवाही येथील १३ महिला तेंदूपाने तोडण्यासाठी
जंगलात गेल्या होत्या.तेंदूपाने तोडत असतांनाच सकाळी ९ वाजेच्या दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने महिलांवर अचानकपणे हल्ला चढवला.अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महिला घाबरल्या व जिवाच्या आकांताने सैरावैरा पळत सुटल्या.अश्यातच चार महिलांवर वाघाने झडप घातली.त्यातच त्यांचा मृत्यू झाला.इतर महिलांपैकी एक महिला ओरडतच गावात गेली आणि तिने आरडाओरडा करत गावकऱ्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.त्यानंतर ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्या घेऊन घटनास्थळी धाव घेतली.त्यावेळी तिथे चार महिलांचे मृतदेह आढळून आले.घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाचे अधिकारी,कर्मचारी आणि पोलिसांनी परिसराचा पंचनामा केला.वाघाच्या हालचालींचा शोध घेण्यासाठी गस्त वाढवण्यात आली असून वन विभागाने नागरिकांना जंगल परिसरात जाऊ नये,तसेच जाण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.घटनेने चौधरी व मोहुर्ले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गुंजेवाही गावात शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!