- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात एक भयंकर घटना आज,शुक्रवार २२ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली असून तेंदूपाने तोडण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला चढवून तब्बल चार महिलांना ठार केले आहे.सदरची घटना सिंदेवाही तालुक्याच्या गुंजेवाही जंगल परिसरात घडली.वाघाच्या हल्ल्यात संगीता संतोष चौधरी वय ३६ वर्षे,सुनीता कौशिक मोहुर्ले वय ३३ वर्षे,कवडूबाई दादाची मोहुर्ले वय ४५ वर्षे व अनुबाई दादाजी मोहुर्ले वय ४६ वर्षे अशी मृतक महिलांची नावे आहेत.विशेष म्हणजे,मागील वर्षाच्या १० मे २०२५ रोजी सिंदेवाही तालुक्यातीलच मेंढा(माल)येथील जंगल परिसरात वाघाने तब्बल तीन महिलांचा बळी गेला होता.त्यानंतरची ही दुसरी मोठी घटना आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास
गुंजेवाही येथील १३ महिला तेंदूपाने तोडण्यासाठी
जंगलात गेल्या होत्या.तेंदूपाने तोडत असतांनाच सकाळी ९ वाजेच्या दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने महिलांवर अचानकपणे हल्ला चढवला.अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महिला घाबरल्या व जिवाच्या आकांताने सैरावैरा पळत सुटल्या.अश्यातच चार महिलांवर वाघाने झडप घातली.त्यातच त्यांचा मृत्यू झाला.इतर महिलांपैकी एक महिला ओरडतच गावात गेली आणि तिने आरडाओरडा करत गावकऱ्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.त्यानंतर ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्या घेऊन घटनास्थळी धाव घेतली.त्यावेळी तिथे चार महिलांचे मृतदेह आढळून आले.घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाचे अधिकारी,कर्मचारी आणि पोलिसांनी परिसराचा पंचनामा केला.वाघाच्या हालचालींचा शोध घेण्यासाठी गस्त वाढवण्यात आली असून वन विभागाने नागरिकांना जंगल परिसरात जाऊ नये,तसेच जाण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.घटनेने चौधरी व मोहुर्ले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गुंजेवाही गावात शोककळा पसरली आहे.
- Advertisement -

