Wednesday, April 15, 2026
Homeगडचिरोलीनक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली आहेत.अशातच आज,शनिवारी १५ मार्चला
भामरागड उपविभागांतर्गत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कवंडे पोलीस ठाण्यापासून शंभर मीटर अंतरावरील जंगल परिसरात नक्षल्यांनी स्फोटके पुरुन ठेवलेली होती.विशेष अभियान पथक गस्त घालत असतांना जंगल परिसरातील झुडपांमध्ये एक बंदूक जवानांच्या निदर्शनास आली.याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देताच बॉम्ब शोधक पथकास पाचारण करुन परिसरात शोधमोहीम राबविण्यात  आली.शोध मोहिमेदरम्यान,झुडपांजवळील जमिनीत अंदाजे दीड ते दोन फूट खोलवर लाल रंगाच्या वायरने बांधलेली प्लास्टिकची पिशवी आढळून आली. तपासणीअंती त्यामध्ये स्फोटक पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर पोलिसांच्या मदतीने ही स्फोटके नष्ट करण्यात आली असल्याने नक्षल्यांचा घातपाताचा कट पोलिसांनी हाणून पाडला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!