Wednesday, September 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशाळेची पहिली घंटा वाजणार 'या' दिवशी..!

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा येत्या,सोमवार १५ जून २०२६ पासूनच करण्यात येणार आहे.यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून,शाळादेखील पारंपरिक पद्धतीनेच ऑफलाईन सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे,शाळा २६ जूनपासून सुरू होणार,वर्ग ऑनलाइन होतील किंवा सुट्ट्या वाढवण्यात येतील अशा अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.शिक्षण विभागाने अशा अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.विद्यार्थी आणि पालकांनी केवळ शासन,शिक्षण संचालनालय किंवा संबंधित शाळांकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावे. महाराष्ट्रातील शाळा आणि ज्युनिअर कॉलेज १५ जूनपासून ऑफलाइन सुरू होणार आहेत.त्याचबरोबर, विदर्भातील वाढत्या उष्णतेचा विचार करून शिक्षण विभागाने विशेष व्यवस्था केली आहे.१५ जून ते २९ जून या कालावधीत विदर्भातील शाळा सकाळी ७ ते ११.४५ या वेळेत भरविण्यात येणार आहेत.यामुळे विद्यार्थ्यांना दुपारच्या प्रखर उन्हाचा त्रास होणार नाही.त्यानंतर ३० जूनपासून नियमित वेळापत्रकानुसार शाळा सुरू राहतील.राज्यभर एकसमान शैक्षणिक दिनदर्शिका लागू करतांना विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही विचार करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!