Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे ५४ वर्षीय ग्रामपंचायत अधिकारी(ग्रामसेवक)प्रल्हाद एन.पाटील यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला व त्यात त्यांचा मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात ग्रामसेवकांनी तीव्र संताप व्यक्त करून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनने राज्यातील सर्व ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा मोठा निर्णय घेतलेला असतांनाच आता ग्रामसभांच्या संख्येला मर्यादा घालून वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्यात यावी व तिला विनामूल्य पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा,या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने विविध जिल्ह्यात आंदोलने करण्यात येत आहेत.विशेष म्हणजे,महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार वर्षातून किमान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे.अश्यातच संघटनेने शासनाकडे ग्रामसभा आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात चार प्रमुख मागण्या केल्या आहेत.त्यात, वर्षातून केवळ एकच मुख्य संवैधानिक ग्रामसभा घेण्यात यावी.इतर सभा केवळ विशेष शासन निर्णयानुसार घेण्यात याव्यात.ग्रामसभेत ऐनवेळी नको ते विषय मांडून अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याच्या प्रकारांना कायदेशीर बंदी घालावी.नियमितपणे जमाखर्च सादर होत असतांना ऐनवेळी मागील पाच वर्षांचा जमाखर्च मागण्याच्या पद्धतीवर मर्यादा आणावी आणि प्रत्येक ग्रामसभेला अनिवार्य आणि पूर्णपणे विनामूल्य पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा,या मागण्यांचा समावेश आहे.मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण राज्यात लोकशाही मार्गाने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असाही इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!