- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-एका ३० वर्षीय तरुणाचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी वन विभागातील पद्मापूर चक जंगल परिसरालगत असलेल्या कुरण गट क्रमांक-२१ मध्ये घडली.अनिल भास्कर दिवटे वय ३० वर्षे,रा.बल्लारपूर,जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून तो काल गुरुवारी जंगल परिसरात रानभाजी तोडत असतांना सदरची घटना घडली.
पाऊस पडताच जंगल परिसरातील विविध प्रकारच्या रानभाज्यांना पालवी फुटत असते.अशातच बाजारपेठेत विक्रीसाठी तसेच रानभाजी खाणारे शौकीन जंगल परिसरात जाऊन रानभाजी तोडून वर्षातून एकदा तरी त्याचा आस्वाद घेत असतात.अश्याच प्रकारे अनिल दिवटे हे पद्मापूर चक जंगल परिसरालगत रानभाजी गोळा करण्यासाठी गेले होते.दुपारच्या सुमारास भाजी तोडत असतांनाच दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला.यातच अनिल दिवटे मृत पावले.घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी तसेच पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान,या घटनेनंतर वनविभागाने संबंधित परिसरात वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे आणि लाइव्ह कॅमेरे बसवले. घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
- Advertisement -

