Monday, September 7, 2026
Homeभंडाराप्रेयसीला भेटायला जाणे युवकास पडले महागात.. - तरुणीकडील मंडळींनी धो-धो धुतले..

प्रेयसीला भेटायला जाणे युवकास पडले महागात.. – तरुणीकडील मंडळींनी धो-धो धुतले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-हल्ली सगळीकडेच आंब्याच्या झाडाला जसे बार फुलून येते,त्याप्रमाणे प्रेम-प्रकरणे बहरून येऊ लागले आहेत.त्यामुळे भेटी-गाठी होणे साहजिकच आहे.अशातच नुकतेच दोन दिवसांपूर्वी प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणास तरुणीकडील मंडळींच्या लक्षात येताच मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.सदरची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलिस स्टेशन हद्दीत घडली.
माहितीनुसार,मोहाडी तालुक्याच्या वडेगाव येथील एका तरुणीला भेटण्यासाठी जवळीलच हरदोली येथील प्रियकर मंगळवारी सायंकाळी गावात पोहोचला. मात्र,तरुणीकडील परिवारास या प्रकाराची कुणकुण लागताच,तिचे भाऊ,वडील व काही नातेवाइकांनी या तरुणाला चांगलाच धो-धो धुतला.मार खाऊनही बदनामीच्या भीतीपोटी पोलिसांत तक्रार झाली नसल्याची माहिती आहे.त्यातच प्रियकराला धो-धो धूने  सुरू असतांना कुणीही मध्यस्थी करण्यासाठी अथवा वाचविण्यासाठी मध्ये पडले नाही.यामुळे त्याची सर्वांनी चांगलीच धुलाई केली.त्यानंतर,प्रियकराने आपल्या गावातील काही मित्रमंडळींना हा प्रकार कळविला. त्यानंतर हरदोली येथील काही मित्रमंडळींनी त्याच्या मदतीसाठी धाव घेतली व त्याला घेऊन ते निघून गेले.भंडारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन त्याला घरी नेण्यात आले व प्रकरणावर चुप्पी साधण्यात आली असली तरीही गावात चर्चेला उधाण आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!