- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज येथे घडली.जयेंद्र भुमेंद्र चौधरी वय ९ वर्षे, रा.निलज असे तलावात बुडून मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
जयेंद्र व त्याचे काही मित्र गाव नजीकच्या कानाबोडी तलाव परिसरात गेले होते.मित्र तलावात मासे पकडत असतांनाच जयेंद्रला सुद्धा मासे पकडण्याची इच्छा झाली.दरम्यान,तलावाजवळ उभा राहून मासे पकडत असतांना त्याचा पाय घसरला व तो तलावातील पाण्यात पडला.तलाव पाण्याने तुडुंब भरलेला व खोल असल्याने जयेंद्र बुडू लागला.याचवेळी उपस्थित मित्रांनी आरडाओरड केली.मात्र,तलावात पाणी भरपूर असल्याने त्याला वाचवता आले नाही.त्यानंतर,मित्रांनी धावत-पळत जात सदर घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली.लागलीच नागरिकांनी तलावाकडे धाव घेत शोध मोहीम राबविली असता जयेंद्रचा मृतदेह तलावात आढळून आला.घटनेने गावात शोककळा पसरली असून चौधरी कुटूंबीय शोकसागरात बुडाला आहे.
तर दुसऱ्या घटनेत गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील बेरडीपार येथे श्रीकृष्ण मूर्ती विसर्जनादरम्यान भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.कार्तिक गौतम वय ३४ वर्षे असे मृत जवानाचे नाव आहे.कार्तिक गौतम हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते.काही दिवसांपूर्वीच ते सुट्टीसाठी आपल्या मूळ गावी बेरडीपार येथे आले होते.गावात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि त्यानंतरच्या उत्सवाचा उत्साह सुरू असतांना ते मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते.विसर्जनादरम्यान पाण्यात उतरल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.या घटनेत त्यांचा बुडून मृत्यू झाला.सुट्टीसाठी गावी आलेल्या जवानाचा अचानकपणे मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

