- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.यंदाचा मुख्य मारबत महोत्सव येत्या,शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारच्या सुमारास शहराच्या गांधी पुतळा परिसरात आयोजित करण्यात आला आहे.यावर्षीच्या महोत्सवात विविध देशांचे प्रतिनिधी,मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार,तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना बोलावण्यात आले आहे.राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते आज,रविवार ६ सप्टेंबर रोजी काळी आणि पिवळी मारबत यांची पूजा करून महोत्सवाचे उद्घाटन झाले.मंत्री आशिष शेलार म्हणाले की,मारबत परंपरा शहरातून वाईट गोष्टी आणि रोगराई दूर पळवण्याचे प्रतीक आहे.राज्य सरकार या परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.दरम्यान,सोशल मीडियावर मारबत पाहण्यासाठी तिकीट लागेल अशा चर्चा पसरल्या होत्या.यावर महानगर पालिका स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी स्पष्ट केले की,मारबत पाहण्यासाठी कोणतेही तिकीट ठेवण्यात आलेले नाही.महानगर पालिकेने फक्त इच्छुक नागरिकांसाठी टी-शर्ट आणि बँड उपलब्ध केले आहेत,जे खरेदी करणे ऐच्छिक आहे.नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन नागपूर महानगर पालिका प्रशासनाने केले आहे.यंदाचा उत्सव फक्त शहरातच नाही,तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने तयारी केली आहे.
- Advertisement -

