Thursday, September 10, 2026
Homeदेसाईगंजअवकाळी पावसाने बळीराजा संकटात; नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी.. -ओबीसी काँग्रेसचे...

अवकाळी पावसाने बळीराजा संकटात; नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी.. -ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-अवकाळी पावसाने देसाईगंज तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजा संकटात सापडला आहे.अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.ऐन कापणीच्या हंगामात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या धान पिकाला कोंब फुटण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून हवामानातील सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे.याचा सर्वाधिक फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.अनेकांनी कापलेले धान सुकवण्यासाठी शेतात ठेवले होते,काही ठिकाणी कापणीचे काम सुरू होते; मात्र,अचानक झालेल्या मुसळधार पावसाने हे सर्व धान भिजून गेले.शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेले धान आता मातीमोल होत असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; अशी मागणी ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी केली आहे.
विशेष म्हणजे,दिवाळी संपताच शेतकऱ्यांनी हलक्या धानकापणीला सुरुवात केली होती.शेतकऱ्यांनी दिवाळी कशीबशी साजरी केली आणि लगेच धानकापणी करून आलेला धान बाजारपेठेत विकून उधार,उसनवारी फेडण्याच्या तयारीत असतांनाच अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.देसाईगंज तालुक्यातील धानपिकावर खोडकिडा,करपा,मावा तुडतुडा या कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने आधीच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.त्यातून शेतकरी कसाबसा सावरला असतांनाच अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याने शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी; यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशीही मागणी मनोज ढोरे यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!