Thursday, July 16, 2026
Homeदेसाईगंजवनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. - विविध योजनांचाही...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने वनहक्कपट्टेधारक शेतकऱ्यांना शेतकरी म्हणून स्वतंत्र ओळख मिळणार आहे.विशेष म्हणजे,पूर्वी वनहक्कपट्टेधारकांची नोंद सातबारावरील इतर हक्क सदरात होत असल्याने त्यांना शेतकरी म्हणून ओळख मिळण्यात आणि पिकांची नोंद करण्यात अडचणी येत होत्या.परिणामी,हजारो पट्टेधारक पीक कर्ज,पीक विमा,कृषी अनुदान,नैसर्गिक आपत्ती भरपाई आणि ॲग्रीस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक यांसारख्या योजनांपासून वंचित राहत होते.यासाठी सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल नियमांत सुधारणा करून वनहक्कपट्टेधारकांसाठी स्वतंत्र ‘गावनमुना ७-ई’ आणि ‘गावनमुना १२-ई’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे वनजमिनींवरील पिकांची स्वतंत्र नोंद घेता येणार आहे.नव्या नियमांमुळे पट्टेधारकांच्या सर्व अडचणी दूर होऊन त्यांना कृषी योजनांचे लाभ मिळणे सुलभ होईल.पण,या नोंदींमुळे कोणताही नवीन मालकी हक्क निर्माण होणार नसून,तो केवळ प्रशासकीय रेकॉर्ड असेल. विद्यमान पट्टेधारकांचे ७-ई आणि १२-ई अभिलेख ३१ ऑगस्टपर्यंत तयार करण्याचे,तर सातबारा नसलेल्या क्षेत्रांचे संयुक्त सर्वेक्षण करून ३१ डिसेंबरपर्यंत ते पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार,ग्रामपंचायत स्तरावरून वनहक्कपट्टेधारकांची माहिती मागविण्यात येत आहे.मात्र,हक्क केवळ वारसहक्काने हस्तांतरित होईल,जमिनीची विक्री किंवा इतर प्रकारे हस्तांतरण करता येणार नाही; असा स्पष्ट शेरा मिळणाऱ्या नव्या सातबारावर असणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!