Thursday, August 6, 2026
Homeभंडाराअनियंत्रित वाहनाचा भीषण अपघात; धान कापणीला जात होते २७ मजूर..

अनियंत्रित वाहनाचा भीषण अपघात; धान कापणीला जात होते २७ मजूर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.येथील पवनी तालुक्यातील सोनेगाव स्मशानभूमीजवळ आज मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटल्याची घटना घडली आहे.या वाहनात २७ मजूर होते.वाहन अनियंत्रित झाल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.अपघातात १४ मजूर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.यामधील दोन जण गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.जखमींना उपचारासाठी भंडारा येथील रुग्णायात दाखल करण्यात आले आहे.

जखमी मजूर हे अड्याळजवळील नेरला येथील असून सोनेगाव येथे धान कापणीला जात होते.जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळी धान कापणी धडाक्यात सुरू आहे. शेतकरी ट्रॅक्टर व मजुरांच्या सहाय्याने धान कापणी उरकून घेत आहेत.धान कापणीला मजूर मिळत नसल्याने दूरवरून वाहनाने मजूर बोलावून शेतीची कामे उरकून घेत आहेत.अड्याळ जवळील नेरला येथील २७ मजूर हे धान कापणीसाठी वाहनाने नेरला येथून सोनेगाव येथे जात असताना सोनेगाव स्मशानभूमीजवळ वाहनचालक-मालक महेंद्र मुरकुटे रा.नेरला याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन एका शेताच्या बांधावर उलटले.त्यात वाहनातील २७ मजूर जखमी झाले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाचा हल्ला; पती ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातून एक धक्कादायक घटना आज,गुरुवार ६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.दावेझरी गाव नजीकच्या चुल्हारडोह-आग्री जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी...

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!