Thursday, August 6, 2026
Homeनवी दिल्लीअरविंद केजरीवालांनी जनतेला दिल्या १० गॅरंटी...- देशात २४ तास विजेची व्यवस्था;गरिबांना मोफत वीज;...

अरविंद केजरीवालांनी जनतेला दिल्या १० गॅरंटी…- देशात २४ तास विजेची व्यवस्था;गरिबांना मोफत वीज; शेतमालाला हमीभाव व इतर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :-दिल्लीतील सत्ताधारी पक्ष आम आदमी पार्टीने आज रविवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकावर जोरदार हल्ला चढवला.आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

मोदींनी दिलेल्या जुन्या आश्वासनांवर जोर देत

केजरीवाल म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात

१५ लाख टाकणार होते,पण तसे झाले नाही.२ कोटी

रोजगार देणार होते,पण तसेही झाली नाही.२०२२

पर्यंत बुलेट ट्रेन चालवण्याच्या बाता मारत होते, पण

अद्याप तसे झालेले नाही. मात्र आम्ही मोफत वीज,

चांगले शिक्षण, मोहल्ला क्लिनीकचे आश्वासन दिले

आणि पूर्णही केले. मोदींची गॅरंटी कोण पूर्ण करणार

माहिती नाही.कारण ते आता ७५ वर्षांचे होणार

असून त्यांनीच बनवलेल्या नियमाप्रमाणे निवृत्त

होतील.परंतु केजरीवाल यांची गॅरंटी केजरीवालच

पूर्ण करेल.एखाद्या देशामध्ये लाखो लोकं अशिक्षित असतील,शिक्षण व्यवस्था चांगली नसेल तर देशाचा विकास होणारच नाही.देशातील जनतेचे आरोग्य चांगले राहिले तरच देशाचा विकास होईल.आज देशातील सरकारी रुग्णालयांची परिस्थिती बिकट आहे.त्यामुळे देशात प्रत्येक गल्लीत मोहल्ला क्लिनिक

सुरू केले जाईल,असे म्हणत केजरीवाल यांनी देशाला १० आश्वासने दिली.

१. देशात २४ तास विजेची व्यवस्था करणार आणि गरिबांना मोफत वीज देणार

२. प्रत्येक गावात, मोहल्ल्यात चांगल्या शाळा उभारणार.देशात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला चांगले आणि मोफत शिक्षण मिळण्याची व्यवस्था करणार

३. प्रत्येक गावात,गल्लीत मोहल्ला क्लिनीक उघडणार. प्रत्येक जिल्ह्यात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार

४. राष्ट्र सर्वप्रथम – लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देणार आणि चीनच्या ताब्यात गेलेली जमीन सोडवणार

५. अग्निवीर योजना लष्करासाठी घातक असून ही योजना बंद करणार. अग्निवीर योजनेद्वारे भरती झालेल्यांना पक्की नोकरी देणार

६. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतमालाला हमीभाव देणार

७. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणार

८. एका वर्षात दोन कोटी रोजगार देण्याची व्यवस्था करणार

९. भाजपच्या वाशिंग मशीनला भर चौकात फोडणार आणि देशाला भ्रष्टाचारमुक्त करणार

१०. व्यापाऱ्यांसाठी जीएसटी प्रणाली अधिक सुकर करणार

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!