Thursday, April 30, 2026
Homeनवी दिल्लीअरविंद केजरीवालांनी जनतेला दिल्या १० गॅरंटी...- देशात २४ तास विजेची व्यवस्था;गरिबांना मोफत वीज;...

अरविंद केजरीवालांनी जनतेला दिल्या १० गॅरंटी…- देशात २४ तास विजेची व्यवस्था;गरिबांना मोफत वीज; शेतमालाला हमीभाव व इतर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :-दिल्लीतील सत्ताधारी पक्ष आम आदमी पार्टीने आज रविवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकावर जोरदार हल्ला चढवला.आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

मोदींनी दिलेल्या जुन्या आश्वासनांवर जोर देत

केजरीवाल म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात

१५ लाख टाकणार होते,पण तसे झाले नाही.२ कोटी

रोजगार देणार होते,पण तसेही झाली नाही.२०२२

पर्यंत बुलेट ट्रेन चालवण्याच्या बाता मारत होते, पण

अद्याप तसे झालेले नाही. मात्र आम्ही मोफत वीज,

चांगले शिक्षण, मोहल्ला क्लिनीकचे आश्वासन दिले

आणि पूर्णही केले. मोदींची गॅरंटी कोण पूर्ण करणार

माहिती नाही.कारण ते आता ७५ वर्षांचे होणार

असून त्यांनीच बनवलेल्या नियमाप्रमाणे निवृत्त

होतील.परंतु केजरीवाल यांची गॅरंटी केजरीवालच

पूर्ण करेल.एखाद्या देशामध्ये लाखो लोकं अशिक्षित असतील,शिक्षण व्यवस्था चांगली नसेल तर देशाचा विकास होणारच नाही.देशातील जनतेचे आरोग्य चांगले राहिले तरच देशाचा विकास होईल.आज देशातील सरकारी रुग्णालयांची परिस्थिती बिकट आहे.त्यामुळे देशात प्रत्येक गल्लीत मोहल्ला क्लिनिक

सुरू केले जाईल,असे म्हणत केजरीवाल यांनी देशाला १० आश्वासने दिली.

१. देशात २४ तास विजेची व्यवस्था करणार आणि गरिबांना मोफत वीज देणार

२. प्रत्येक गावात, मोहल्ल्यात चांगल्या शाळा उभारणार.देशात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला चांगले आणि मोफत शिक्षण मिळण्याची व्यवस्था करणार

३. प्रत्येक गावात,गल्लीत मोहल्ला क्लिनीक उघडणार. प्रत्येक जिल्ह्यात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार

४. राष्ट्र सर्वप्रथम – लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देणार आणि चीनच्या ताब्यात गेलेली जमीन सोडवणार

५. अग्निवीर योजना लष्करासाठी घातक असून ही योजना बंद करणार. अग्निवीर योजनेद्वारे भरती झालेल्यांना पक्की नोकरी देणार

६. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतमालाला हमीभाव देणार

७. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणार

८. एका वर्षात दोन कोटी रोजगार देण्याची व्यवस्था करणार

९. भाजपच्या वाशिंग मशीनला भर चौकात फोडणार आणि देशाला भ्रष्टाचारमुक्त करणार

१०. व्यापाऱ्यांसाठी जीएसटी प्रणाली अधिक सुकर करणार

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

पोटात दुखू लागल्याने झाला भांडाफोड; अल्पवयीन विद्यार्थिनी आठ महिन्यांची गर्भवती.. – तरुणावर अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वयात आल्यानंतर मुला-मुलींमध्ये एकमेकांविषयी आकर्षण वाढते आणि तिथूनच पुढे सुरू होतेय अनोखी 'लव्हस्टोरी' ही काही सांगण्याची गरज नाही.पण,अल्पवयीनांची 'लव्हस्टोरी' चिरकाल टिकणारी...

आता ‘त्या’ आमदार अन् खासदारांना उठून अभिवादन करण्याची गरज नाही..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील कित्येक आमदार आणि खासदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अश्यातच काहीजणांवर फौजदारी कारवाई झालेली वा इतर प्रकरणात दोषी ठरलेले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!