Thursday, April 30, 2026
Homeनवी दिल्लीअखेर जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी.. - दोन टप्प्यात केली जाणार जातनिहाय जनगणना..

अखेर जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी.. – दोन टप्प्यात केली जाणार जातनिहाय जनगणना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नवी दिल्ली :-केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. बुधवार ३० एप्रिल २०२५ ला केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली होती.पार पडलेल्या बैठकीत केंद्र सरकारने देशभरात  जातनिहाय  जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय रेल्वे तथा देशाचे माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्वंकष जाहीर केले होते.त्यानुसार आता गृह मंत्रालयाने आज,सोमवार १६ जून रोजी जातनिहाय जनगणनेसाठी अधिसूचना जारी केली आहे.केंद्र सरकार दोन टप्प्यात जातनिहाय जनगणना करणार आहे.अधिसूचनेनुसार,पहिला टप्पा १ ऑक्टोंबर २०२६ पासून सुरू होईल.त्यात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड,जम्मू आणि काश्मीर आणि लडाख ही चार राज्ये समाविष्ट आहेत.तर दुसरा टप्पा १ मार्च २०२७ पासून सुरू होईल.यामध्ये देशातील उर्वरित राज्यांमध्ये जनगणना सुरू होईल.तत्पूर्वी काल रविवारी गृहमंत्री अमित शहा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत १६ व्या जातनिहाय जनगणनेच्या तयारीचा आढावा घेतला.दर १० वर्षांनी जातनिहाय जनगणना केली जाते.२०११ मध्ये देशातील शेवटची जात जनगणना झाली होती. पुढील जनगणना २०२१ मध्ये होणार होती,पण कोविड-१९ महामारीमुळे ती पुढे ढकलण्यात आली व आता २०२६ ते २०२७ मध्ये जातनिहाय जनगणना केली जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!