Thursday, August 6, 2026
Homeनागपूरसरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. - कंत्राटदार आक्रमक..

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त झालेल्या कंत्राटदारांनी एकत्र होत निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार केला आहे.त्यानुसार,येत्या १८ ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत धरणे देण्यात येणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग,आदिवासी विभाग,जिल्हा परिषद, जलसंपदा,नगरविकास,महसूल अशा विविध विभागांतील बांधकामांचे सुमारे ९० हजार कोटी रुपये थकबाकी असल्याचा आरोप महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनने केला आहे.सर्व विभागांच्या मागण्या एकाचवेळी केल्याने सरकार व विभागांकडून विविध कारणे समोर करून टोलवाटोलवी करण्यात येते.सदरची बाब लक्षात घेता फेडरेशनने स्ट्रॅटेजीत बदल केला आहे. जलजीवन मिशन कंत्राटदारांच्यावतीने येत्या,१० ऑगस्ट रोजी नागपूरच्या संविधान चौकात धरणे देण्यात येणार आहे,यानंतर मुख्यमंत्री कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.मुंबईतील आंदोलनात सर्वात आधी आदिवासी विभागाकडे असलेल्या सुमारे १० हजार कोटी रुपयांची थकबाकी तात्काळ मिळावी,ही मागणी रेटण्यात येणार आहे.यानंतर टप्प्याटप्प्याने एकेका विभागाची मागणी करण्यात येईल.आंदोलनात राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कंत्राटदार सहभागी होणार असल्याचे फेडरेशनने स्पष्ट केले आहे.मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलन तीव करण्यात येईल आणि पुढील टप्प्यात राज्यव्यापी कामबंद आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे.आदिवासी विकास विभागाकडे दोन वर्षांपासून थकबाकी आहे.१२ हजार कोटी रुपयांपैकी २ हजार कोटी रुपये दिले. यंदा फक्त ८०० कोटी रुपये तरतूद केली,याच प्रमाणात तरतूद राहिल्यास दहा वर्षे कामांचे पैसे मिळणार नाहीत,कंत्राटदार कर्जबाजारी झाले आहे.काहींची घरे गहाण आहेत.त्यामुळे सरकारने सरसकट थकबाकी द्यावी,अशी मागणी फेडरेशनचे उपाध्यक्ष किसन पानसरे यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

तब्बल १५४ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ होणार स्थापन; अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ग्रामपंचायत व नगर परिषद आणि नगर पंचायत स्तरावर तब्बल १५४ नवीन 'आपले सरकार सेवा केंद्रे' स्थापन करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात...

कोठी-पिपलीबुर्गी मार्गावरील पुलाच्या नुकसानीची होणार उच्चस्तरीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-कोठी-रेगाडंडी-पिपलीबुर्गी मार्गावरील सा.क्र.६/९०० येथील मोठ्या पुलाच्या नुकसानीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!