- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त झालेल्या कंत्राटदारांनी एकत्र होत निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार केला आहे.त्यानुसार,येत्या १८ ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत धरणे देण्यात येणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग,आदिवासी विभाग,जिल्हा परिषद, जलसंपदा,नगरविकास,महसूल अशा विविध विभागांतील बांधकामांचे सुमारे ९० हजार कोटी रुपये थकबाकी असल्याचा आरोप महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनने केला आहे.सर्व विभागांच्या मागण्या एकाचवेळी केल्याने सरकार व विभागांकडून विविध कारणे समोर करून टोलवाटोलवी करण्यात येते.सदरची बाब लक्षात घेता फेडरेशनने स्ट्रॅटेजीत बदल केला आहे. जलजीवन मिशन कंत्राटदारांच्यावतीने येत्या,१० ऑगस्ट रोजी नागपूरच्या संविधान चौकात धरणे देण्यात येणार आहे,यानंतर मुख्यमंत्री कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.मुंबईतील आंदोलनात सर्वात आधी आदिवासी विभागाकडे असलेल्या सुमारे १० हजार कोटी रुपयांची थकबाकी तात्काळ मिळावी,ही मागणी रेटण्यात येणार आहे.यानंतर टप्प्याटप्प्याने एकेका विभागाची मागणी करण्यात येईल.आंदोलनात राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कंत्राटदार सहभागी होणार असल्याचे फेडरेशनने स्पष्ट केले आहे.मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलन तीव करण्यात येईल आणि पुढील टप्प्यात राज्यव्यापी कामबंद आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे.आदिवासी विकास विभागाकडे दोन वर्षांपासून थकबाकी आहे.१२ हजार कोटी रुपयांपैकी २ हजार कोटी रुपये दिले. यंदा फक्त ८०० कोटी रुपये तरतूद केली,याच प्रमाणात तरतूद राहिल्यास दहा वर्षे कामांचे पैसे मिळणार नाहीत,कंत्राटदार कर्जबाजारी झाले आहे.काहींची घरे गहाण आहेत.त्यामुळे सरकारने सरसकट थकबाकी द्यावी,अशी मागणी फेडरेशनचे उपाध्यक्ष किसन पानसरे यांनी केली आहे.
- Advertisement -

