Saturday, May 30, 2026
Homeचंद्रपूरमध्यरात्री थरार; जनावरांना सोडले अन् मानवाला पकडले.. - वाघाच्या हल्ल्यात इसम ठार..

मध्यरात्री थरार; जनावरांना सोडले अन् मानवाला पकडले.. – वाघाच्या हल्ल्यात इसम ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील फिस्कूटी गाव नजीक परिसरात वाघाच्या हल्ल्यात मेंढपाळ ठार झाल्याची घटना शुक्रवारच्या मध्यरात्री उघडीस आली. वासुदेव गणपत कंकलवार वय ३६ वर्षे, रा.जुनासूर्ला, ता.मूल,जि.चंद्रपूर असे मृताचे नाव असून वर्षभरातील वन्यप्राण्याच्या हल्ल्यातील आठवा बळी ठरला आहे. वडिलोपार्जित मेंढ्या पालनाचा व्यवसाय करीत असलेले कंकलवार नेहमी जनावरे चराईसाठी न्यायचे.शुक्रवारी जनावरे चराईसाठी नेल्यावर रात्रीच्या सुमारास रामदास जंगठे यांच्या शेतात महाकाली मंदिरजवळ मेंढ्याची लाग बसवून झोपले होते.यावेळी भाऊ मारोती कंकलवार व त्यांची पत्नी वनिता कंकलवार देखील उपस्थित होत्या. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अचानक जनावरांचा आवाज आल्याने वासुदेव जागे झाले,ते बघण्यासाठी जनावरांकडे गेले असता बाजूलाच दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घालत त्यांच्यावर हल्ला चढविला.भाऊ जागा झाल्याने त्यांनी आरडाओरडा केला.याबाबतची माहिती त्यांच्या भावाने नातेवाईकांना दिली. नातेवाईकांनी घटनास्थळ गाठून वनविभाग आणि पोलिस ठाण्यात माहिती दिली.त्यानंतर,पोलिस ठाण्याचे पथक आणि वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून वासुदेवचा शोध घेतला असता त्याचे मृतदेह जवळच मिळून आले.दरम्यान,मूल पोलिस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड यांनी पोलिस पथकासह भेट देऊन पंचनामा केला.यावेळी वनविभागाचे विभागीय वनाधिकारी योगेश वाघाये,सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेळके,पोंभुर्णाचे वनपरिक्षेत्राधिकारी अनंता राखुंडे,क्षेत्र सहाय्यक बी.एम दुपारे,वनरक्षक प्रिया लांडगे,वनरक्षक सोनेकर यांची उपस्थिती होती. वनविभागाने पंचनामा करून कंकलवार यांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयाची तात्काळ मदत दिली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

रखरखत्या उन्हात शेतातच टाकली खाट अन् उपोषणास केली सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसून आज,शनिवार ३० मे पासून सकाळी दहा वाजे जालना...

लाखांदूर-देसाईगंज मार्गावर पेटत्या कारचा थरार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर-देसाईगंज मार्गावरील दुर्गा माता मंदिर पहाडीजवळ भर उन्हात पेटत्या कारचा थरार काल शुक्रवारी घडला.लाखांदूरहून निघालेली कार सोनी-चप्राळ पहाडीजवळ येताच धावत्या...

आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा नदीत बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील वणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, शुक्रवार २९ मे रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!