- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्हा पोलिस प्रशासनाने चंद्रपूर,वरोरा,चिमूर, ब्रम्हपुरी,मूल,राजुरा आणि गडचांदूर या सर्व पोलीस उपविभागांतील सराईत गो-तस्करांची संपूर्ण माहिती संकलित केली असून जिल्ह्यात तब्बल २९३ सराईत गो-तस्करांची नोंद करण्यात आली आहे.अश्यातच जिल्ह्यात वाढत्या अवैध गोवंश तस्करी,कत्तल व मुक्या जनावरांवरील क्रूरतेला आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेत तस्करांना तंबी दिली आहे.यापुढे अवैध जनावरांची वाहतूक व गो-तस्करी करणाऱ्यांवर केवळ सामान्य गुन्हे दाखल न करता संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत थेट ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात येईल व अश्या गुन्ह्यांमध्ये जामीन मिळणे कठीण होणार असून आरोपींना दीर्घकाळ तुरुंगवासाला सामोरे जावे लागेल. तसेच गो-तस्करीतून मिळवलेल्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येणार असून तस्करीसाठी वापरलेली वाहने थेट सरकारकडे जमा करण्यात येतील,असाही इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.जिल्हा पोलीस मुख्यालयातील आयोजित विशेष “ओळख परेड व प्रतिबंधात्मक कारवाई कॅम्प” जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने सराईत गो-तस्करांना तस्करीचे धंदे तात्काळ बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक कायंदे पाटील,सचिन खेत्रे,स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय अमोल काचोरे यांचेसह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस पथक उपस्थित होते.
- Advertisement -

