- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसून आज,शनिवार ३० मे पासून सकाळी दहा वाजे जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या त्यांच्या गावी रोडवरील शेतात खाट टाकून रखरखत्या उन्हात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.यावेळी ना मंडप..ना कुलर..थेट शेतशिवारात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.१६ मे २०२६ रोजी मराठा समन्वयक समितीची बैठक पार पडली होती.त्यावेळेस, आंदोलन सुरू व्हायच्या आधी सरकारने आंदोलनाबाबत योग्य ती कार्यवाही करावी.एकदा आंदोलन छेडले तर पुन्हा माघार घेणार नाही आणि आपण कुणाचेही ऐकणार नाही,अशी थेट भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती.सरकारने ३० तारखेच्या आत मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात.३० तारखेनंतर सरकारसाठी वेळ वाढवून देणार नाही; असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले होते.अश्यातच आता आजपासून भर उन्हात आमरण उपोषणाला सुरुवात केल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.तत्पूर्वी काल शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांची राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी भेट घेतली. दरम्यान,दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही संवाद साधून जरांगे पाटील यांनी केलेल्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात आंदोलनाचे पडसाद उमटू लागले असून मराठा समाज बांधवांनी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून रास्तारोको आंदोलन सुरू केले.
- Advertisement -

