- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना करणे व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.यात रोहयो विभागातील म्हणजेच रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती हर्षलता गेडाम व भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती निशाताई कांबळे अशी निलंबित करण्यात आलेल्या दोन्ही उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्यांची नावे असून
याबाबत महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव प्रविण पाटील यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार सदरची कारवाई केली आहे.या संदर्भातील प्रत्र नुकतेच जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे.तसेच ‘महाराष्ट्र नागरी सेवा(वर्तणूक) नियम,१९७९’ मधील नियम ३ चा भंग केल्याने शासनाने दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशी करण्याचे देखील निश्चित केले आहे.निलंबन कालावधीत दोन्ही अधिकाऱ्यांचे मुख्यालय रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय राहणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
- Advertisement -

