- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून गावकऱ्यांनी वाघाने मारल्याची बोंब सुरू होताच अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील शंकरपूरपासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावरील भंडारा जिल्ह्याच्या सीमेवरील कोलारी परिसरात उघडकीस आली.माधव कानूजी रेवाडे वय ५२ वर्षे,रा.काकेपार, ता.पवनी,जि.भंडारा असे मृतकाचे नाव असून ते शेळ्या राखण्याचे काम करायचे.त्यातच,शनिवार २३ मे २०२६ रोजी त्यांनी घरच्यांना दवाखान्यात जाऊन येतो,असे म्हणून बेपत्ता झाले होते.कुठेही थांगपत्ता लागलेला नसल्याने कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी भंडारा जिल्ह्याच्या पवनी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती.अश्यातच शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलिस व वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला. नेमका मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.पुढील तपास सुरू आहे.
- Advertisement -

