- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
प्रशांत गेडाम
सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने तातडीने माकडांचा बंदोबस्त करावा,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
गुरुवारी ९ जुलैच्या सकाळी सुमारे साडे सहा वाजता शहरातील आंबेडकर चौक(प्रभाग क्र.८)परिसरातील २६ वर्षीय शुभम विलास रामटेके हे घराच्या गच्चीवर ब्रश करत उभे असतांना माकडांच्या टोळीतील एका माकडाने अचानक झडप घालून त्यांच्या कमरेला चावा घेतला.या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.त्यानंतर परत आज,रविवार १२ जुलैच्या सकाळी पुन्हा आंबेडकर चौक परिसरात जिजाबाई नागरे यांच्यावर माकडाने हल्ला चढवून त्यांच्या मांडीला घाव केला.या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच वाढले आहे.माकडांच्या हैदोसामुळे महिला,लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडतांना धास्तावलेले आहेत.
सिंदेवाही शहरात माकडांचा वावर गेल्या काही दिवसांपासून वाढला असून ते घरांच्या गच्च्यांवर, झाडांवर तसेच रस्त्यावर मुक्तपणे फिरत आहेत. नागरिकांवर अचानक हल्ले होत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने वनविभागाने तातडीने माकडांना पकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे,तसेच नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात,अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.वेळेत ठोस पावले उचलण्यात आली नाहीत,तर आणखी गंभीर घटना घडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
- Advertisement -

