Monday, August 24, 2026
Homeसिंदेवाहीभीषण अपघातात मायलेकीसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू..

भीषण अपघातात मायलेकीसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
प्रशांत गेडाम
सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही तालुक्यातील पवनाचक गावातील मजुरांवर तेलंगणा राज्यातील रामगुंडम परिसरात काळाने घाला घातल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला,तर तब्बल २७ मजूर गंभीर जखमी झालेत.या दुर्घटनेमुळे पवनाचक गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील पवनाचक गावातील मजूर स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध नसल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही भात रोवणीच्या हंगामी कामासाठी तेलंगणा राज्यात गेले होते.सलग तीन दिवस त्यांनी शेतात भात रोवणीचे काम केले.काल गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेतातील कामे आटोपून ते राहत्या ठिकाणी परत जात असतांना रामगुंडम परिसरात त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला.अपघाताची भीषणता इतकी जोरदार होती की घटनास्थळीच चार मजुरांचा मृत्यू झाला,तर अनेकजण गंभीर जखमी झाले.या दुर्घटनेत अतुल वासुदेव सोनुले वय ४५ वर्षे,रा.पवनाचक, ता.सिंदेवाही,जि.चंद्रपूर,अर्चना जनार्धन सोनुले वय ४० वर्षे,रा.पवना चक,ता.सिंदेवाही, रंजना प्रभाकर शेंडे वय ५० वर्षे,रा.पवना चक, ता.सिंदेवाही आणि प्रभा सिताराम मोहुर्ले वय ५६ वर्षे,रा.वाढोना,ता. नागभीड,जि.चंद्रपूर अशी मृतांची नावे आहेत.तर जखमी २७ मजुरांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,काहींची प्रकृती चिंताजनक आहे.या दुर्घटनेतील सर्वाधिक हृदयद्रावक बाब म्हणजे अर्चना जनार्धन सोनूले आणि प्रभा सीताराम मोहुर्ले या मायलेकींचा एकाच अपघातात मृत्यू झाला.या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.
ग्रामीण भागात पुरेसा रोजगार उपलब्ध नसल्याने अनेक कष्टकरी मजुरांना उदरनिर्वाहासाठी परराज्यात जावे लागते.मात्र,प्रवासात होणारे अपघात अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत.भाकरीच्या शोधात घरापासून दूर गेलेल्या मजुरांचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू होणे ही अत्यंत वेदनादायी बाब असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.सिंदेवाही तालुक्यात यापूर्वी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांतही अनेकांनी जीव गमावला आहे.आता रोजगारासाठी परराज्यात गेलेल्या मजुरांच्या अपघाती मृत्यूने ग्रामीण भागातील रोजगार,सुरक्षित प्रवास आणि मजुरांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शासनाने ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला प्राधान्य देऊन अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!