भंडारा :-काही दिवस सुट्टीवर गेलेल्या पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.हजेरी तर लावत आहे; मात्र,पाऊस पूर येईपर्यंत सुट्टी करत नसल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळित होऊ लागले आहे.अश्यातच आज,शुक्रवार २५ जुलै रोजी हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यासह भंडारा जिल्ह्यास “रेड अलर्ट” म्हणजेच मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने दोन्ही जिल्ह्यात सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील विविध धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असून,गोसेखुर्द धरणाचे २१ दरवाजे उघडण्यात आले आहेत.गोसेखुर्दमधून २३९०.६८ क्युमेक्स विसर्ग सुरू आहे.भंडारा जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते यांनी सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आज शुक्रवारी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
- अन्य धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू👇

