- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-भंडारा जवाहरनगर स्थित आयुध निर्माणी येथील २४ जानेवारीला झालेल्या भीषण स्फोटात कारखान्यातील ८ कर्मचारी ठार झाले तर,५ जण गंभीर जखमी झाले होते.त्यामुळे आज,बुधवारी २९ जानेवारीला सलग तिसऱ्या दिवशीही कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू होते.दरम्यान,आज निर्माणी परिसरातील हजारो गावकऱ्यांनी कँडल मार्च काढून लुंबिनी पार्क येथे मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.जवाहरनगर आयुध निर्माणीतील विविध विभागातील बिल्डिंग,मशिनरी व अन्य सामुग्री ही जुन्या काळातील आहे.यात नव्याने बदल करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून वारंवार केली जात आहे. धोकादायक विभागात काम करतांना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधात कुठलीही उपाययोजना निर्माणी प्रशासनाद्वारे केली गेली नाही.या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे २४ जानेवारीला अचानक स्फोट होऊन आठ जणांचा मृत्यू झाला तर,पाच कामगार गंभीर जखमी झाले.अशा घटनेची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता कर्मचाऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही,तोपर्यंत निर्माणी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असून आज सायंकाळी निर्माणी कर्मचाऱ्यांनी निर्माणीतील मुख्य द्वार ते जवाहरनगर वसाहत परिसरातील लुंबिनी पार्कपर्यंत कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.यात लुंबिनी पार्कमध्ये शोकसभा घेऊन मृत कर्मचाऱ्यांच्या मानवंदना व श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी आयुध निर्माणी वसाहतीतील कामगारांच्या कुटुंबीयांसह परिसरातील सावरी,सावली,कोंढा,ठाणा आदी गावांतील हजारो महिला पुरुषांचा समावेश आहे.आयुध निर्माणीत २४ जानेवारीच्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या आठ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सोमवारी मदतनिधीचे वाटप करण्यात आले.
- Advertisement -

