Sunday, July 26, 2026
Homeगडचिरोलीदुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम यशस्वी ठरत आहे.या उपक्रमांतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण,निवास व भोजनाची मोफत सुविधा उपलब्ध करून देत त्यांना देशातील नामांकित विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सक्षम करण्यात आले.
बारावी परीक्षा पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील इच्छुक व गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्यासाठी ४५ दिवसांचा निवासी क्रॅश कोर्स आयोजित करण्यात आला.संकल्प फाउंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा,राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश प्रक्रिया,करिअर मार्गदर्शन,स्पर्धात्मक परीक्षांची तयारी,इंग्रजी संवाद कौशल्य,तार्किक विचार क्षमता,मुलाखत तंत्र आणि व्यक्तिमत्त्व विकास याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम आता दिसून येत असून,आतापर्यंत ७८ विद्यार्थ्यांनी देशातील विविध नामांकित विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेत यश संपादन केले आहे.यामध्ये नवनिर्मित विद्यापीठात ३६, फर्ग्युसन महाविद्यालय/विद्यापीठात ३२,अशिम प्रेमजी विद्यापीठात ६,जी.आर.एफ.विद्यापीठात २ तसेच शिव नाडर विद्यापीठ,आयआयएचएस-१ आणि एनआयटी-१ विद्यापीठात विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी प्राप्त झाली आहे.
देशातील ४६ केंद्रीय विद्यापीठे तसेच शंभरहून अधिक नामांकित खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी CUET ही समान प्रवेश परीक्षा घेतली जाते.यावर्षी १५ मे ते ३१ मे दरम्यान झालेल्या या परीक्षेचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर घेतला. आगामी काळात CUET परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आणखी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.
समाज कल्याण विभागाच्या या अभिनव उपक्रमामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. ‘मिशन-२००’ हा केवळ प्रवेश मिळवून देणारा उपक्रम नसून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास,करिअर दृष्टिकोन आणि स्पर्धात्मक क्षमतेत आमूलाग्र बदल घडवून आणणारा शैक्षणिक प्रयोग ठरत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!