Wednesday, June 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तविदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५ जून २०२६ पासून सुरू होणाऱ्या शाळा आता विदर्भात २२ जून २०२६ पासून सुरू होणार आहेत.वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.विदर्भातील तापमान सतत ४२ अंश सेल्सिअस ते ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असल्याने शिक्षक आणि पालक संघटनांनी शाळा २६ जूनपर्यंत पुढे ढकलण्याची मागणी केली होती.या मागणीवर सरकारकडून तातडीने निर्णय न झाल्याने काही संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.या याचिकेवर सुनावणी होण्यापूर्वीच सरकारने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शाळा उशिरा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला.त्यानुसार,२२ जून ते ३० जून या कालावधीत विदर्भातील सर्व शाळा केवळ सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहेत.दुपारच्या कडक उन्हापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे,यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानंतर १ जुलै २०२६ पासून शाळांचे कामकाज नियमित वेळेनुसार सुरू होईल.विदर्भ वगळता राज्यातील उर्वरित सर्व विभागांमधील शाळा १५ जूनपासून पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सुरू होणार आहेत.सदरचा निर्णय केवळ विदर्भातील हवामान परिस्थिती लक्षात घेऊन घेण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

३० हजाराची लाच भोवली; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मुख्य अभियंता अडकला एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सगळीकडे भ्रष्टाचाराने कळस गाठलेला असतांनाच नागपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज,बुधवार १० जून रोजी धडक कारवाई करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य...

घर-यादी गणनेत गडचिरोली जिल्हा संपूर्ण राज्यात आघाडीवर; ९९.४६ टक्के नोंदी पूर्ण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताच्या जनगणना-२०२७ अंतर्गत सध्या राज्यभर घर-यादी गणना मोहीम राबविण्यात येत आहे.१० जून २०२६ रोजीच्या आढावा अहवालानुसार राज्यात सरासरी १३.१७ टक्के घर-यादी...

पूर्वी केवळ कागदावर असणारे प्रकल्प आज प्रत्यक्षात साकार होतांना दिसत आहेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – प्रधानमंत्री यांच्या दीर्घ सेवेबद्दल महाराष्ट्राच्या वतीने केले अभिनंदन..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-नव्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्थान अढळ असून त्यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्याही विकासाला नवी क्रांतिकारी दिशा...

देसाईगंज रेल्वे बोगदा मार्ग तब्बल २३ दिवस राहणार वाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-देसाईगंज(वडसा)रेल्वे स्थानकाजवळील एलएचएस-५९ म्हणजेच रेल्वे बोगदा अंडरपास मार्गावरील दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने या मार्गावरील वाहतूक आज,बुधवार १० जून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!