- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती व्यक्त केली जात असतांनाच आज,मंगळवार ९ जून रोजी पाच तरुणांपैकी अद्याप तीन तरुणांचे मृतदेह सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.विशेष म्हणजे,नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांचे वर्धा नदीच्या काठावर कपडे,चपला व मोबाईल आढळून आले होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहराच्या इंदिरानगर परिसरातील रहिवासी असलेले तन्मय पाथाडे वय १७ वर्षे,समय सोनटक्के वय १७ वर्षे,शिव केळझरकर वय १८ वर्षे,सनी आसामपिल्ली वय १८ वर्षे आणि रोहित बोबडे वय १९ वर्षे हे पाच मित्र काल सोमवारी दुपारच्या सुमारास म्हातारदेवीजवळील वर्धा नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते.बराच वेळ होऊनही मुले घरी परतली नसल्याने त्यांच्या पालकांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध करायला सुरुवात केली.या दरम्यान,काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी तरुणांना नदीच्या दिशेने जातांना पाहिले होते.त्यानुसार,शोधमोहीम राबविण्यात आली असता वर्धा नदीच्या काठावर संबंधित तरुणांचे कपडे,चपला व मोबाईल आढळून आले होते. कपडे व इतर साहित्य नदीकाठावर सापडल्याने ते नदीत उतरले असावेत आणि पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले असावेत,अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यानुसार,स्थानिक प्रशासन,पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने नदीपात्रात रात्री उशिरापर्यंत युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू होती.अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.परत आज मंगळवारी सकाळच्या सुमारास शोधमोहीम सुरू केली असता दुपारपर्यंत तीन तरुणांचे मृतदेह सापडले असून उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू आहे.
- Advertisement -

