Sunday, July 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तकर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत.अशा परिस्थितीत राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राबविलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ आता आधार प्रमाणीकरणाशी जोडण्यात आला आहे.या योजनेंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे.यासोबतच जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात आणि बँकांचे कर्ज वेळेत भरतात,अशा शिस्तबद्ध कर्जदारांनाही शासनाने दिलासा दिला आहे. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली.अश्यातच शासनाच्या निर्देशानुसार कर्जमाफीचा लाभ थेट पात्र लाभार्थीपर्यंत पोहोचावा आणि अपात्र लाभार्थीना लाभ मिळू नये यासाठी आधार प्रमाणीकरणाची अट घालण्यात आली आहे.ओटीपी, बायोमेट्रिक किंवा आयरिस स्कॅनच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ओळख निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे आधार कार्डवरील माहिती अचूक असणे तसेच मोबाइल क्रमांक आधारशी जोडलेला असणे आवश्यक आहे. योजनेस पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या आधार कार्ड सेवा केंद्रांमध्ये जाऊन आपले आधार कार्ड प्रमाणीकरण(व्हेरिफिकेशन)करून घ्यावे.आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!