Tuesday, June 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तकर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत.अशा परिस्थितीत राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राबविलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ आता आधार प्रमाणीकरणाशी जोडण्यात आला आहे.या योजनेंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे.यासोबतच जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात आणि बँकांचे कर्ज वेळेत भरतात,अशा शिस्तबद्ध कर्जदारांनाही शासनाने दिलासा दिला आहे. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली.अश्यातच शासनाच्या निर्देशानुसार कर्जमाफीचा लाभ थेट पात्र लाभार्थीपर्यंत पोहोचावा आणि अपात्र लाभार्थीना लाभ मिळू नये यासाठी आधार प्रमाणीकरणाची अट घालण्यात आली आहे.ओटीपी, बायोमेट्रिक किंवा आयरिस स्कॅनच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ओळख निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे आधार कार्डवरील माहिती अचूक असणे तसेच मोबाइल क्रमांक आधारशी जोडलेला असणे आवश्यक आहे. योजनेस पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या आधार कार्ड सेवा केंद्रांमध्ये जाऊन आपले आधार कार्ड प्रमाणीकरण(व्हेरिफिकेशन)करून घ्यावे.आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

येत्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन.. – समस्याग्रस्त व पीडित महिलांना वैयक्तिक तक्रारी आणि अडचणी मांडण्यासाठी व्यासपीठ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील महिलांच्या समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या,सोमवार १५ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!