Tuesday, July 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तकर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत.अशा परिस्थितीत राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राबविलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ आता आधार प्रमाणीकरणाशी जोडण्यात आला आहे.या योजनेंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे.यासोबतच जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात आणि बँकांचे कर्ज वेळेत भरतात,अशा शिस्तबद्ध कर्जदारांनाही शासनाने दिलासा दिला आहे. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली.अश्यातच शासनाच्या निर्देशानुसार कर्जमाफीचा लाभ थेट पात्र लाभार्थीपर्यंत पोहोचावा आणि अपात्र लाभार्थीना लाभ मिळू नये यासाठी आधार प्रमाणीकरणाची अट घालण्यात आली आहे.ओटीपी, बायोमेट्रिक किंवा आयरिस स्कॅनच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ओळख निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे आधार कार्डवरील माहिती अचूक असणे तसेच मोबाइल क्रमांक आधारशी जोडलेला असणे आवश्यक आहे. योजनेस पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या आधार कार्ड सेवा केंद्रांमध्ये जाऊन आपले आधार कार्ड प्रमाणीकरण(व्हेरिफिकेशन)करून घ्यावे.आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!