- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :-देसाईगंज शहराच्या विश्राम गृहात आज,२३ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीची महाराष्ट्र बंद च्या संदर्भात बैठक संपन्न झाली.सदर बैठकीत उद्या दिनांक- २४ आगस्ट रोजी देसाईगंज शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.बदलापूर येथील शालेय विद्यार्थिनी वरील अत्याचार आणि अन्य घटनेवर उद्या संपूर्ण महाराष्ट्र बंद ची हाक महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने दिलेली आहे.त्याच पार्शवभूमीवर उद्या देसाईगंज शहर कडकडीत बंद असणार आहे.यात राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट ),समाजवादी पार्टी,शिवसेना (उद्धव बाळासाहेब गट ), आम् आदमी पार्टी आणी महाविकास आघाडी इंडिया आघाडी तील पक्ष सामील होणार आहेत.
आज,झालेल्या बैठकीत काँग्रेस पक्षाचे देसाईगंज तालुका अध्यक्ष राजू बुल्ले,समाजवादी पार्टी देसाईगंज तालुका अध्यक्ष डोमाजी दिवटे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष क्षितिज उके,अविनाश गेडाम, जिब्राईल शेख इलियास खान,विकास प्रधान, पिंकू बावणे,दिगांबर मेश्राम,सीमा डोंगरे,प्रमोद करंडे, लिलाधर भर्रे,नंदू चावला,डॉ श्रीकांत बनसोड,विलास ठाकरे,संजय करांकर,नरेंद्र गजपुरे, नितीन राऊत,जयमाला पेंदाम,जगदीश शेंद्रे,तांबेश्वर ढोरे,टीकाराम सहारे,दुशांत वाडगुरे आदी उपस्थित होते
.
- Advertisement -

