- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-बऱ्याच दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे.त्यामुळे सकाळपासूनच शहरांसह ग्रामीण भागातील रस्ते सामसूम-चिडीचूप झाल्यासारखे दिसून येतात.हल्ली नागरिक दिवसा घराबाहेर न निघता बाजार वा इतर कामासाठी सायंकाळी निघतांना दिसून येत आहेत.त्याचे कारणही तसेच आहे.एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकू लागला आहे.तर पुढील महिन्यात काही खरे नाही,अशी चर्चा गल्लीबोळात नागरिकांमध्ये सुरू आहे.त्यातच काल,शनिवार १९ एप्रिल रोजी राज्यात सर्वात जास्त उष्ण तापमान नागपूरचे होते.तर आज,रविवार २० एप्रिलला नागपूरला मागे टाकत चंद्रपूर सर्वात जास्त हॉट ठरला आहे.काल शनिवारी नागपूरचे तापमान ४४.७ अंश सेल्सिअस होते.तर आज रविवारी नागपूरच्या तापमानात ०.७ अंशाने घट झाली तर चंद्रपूरच्या तापमानात ०.६ अंशाने वाढ होऊन ४४.६ अंशाची नोंद करण्यात आली आहे.अशातच आज,रविवारी ब्रम्हपुरी,वर्धा,अकोला,अमरावती व नागपूर येथे ४४ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
- Advertisement -

