Saturday, May 30, 2026
Homeचंद्रपूरआज नागपूरला मागे टाकत चंद्रपूर ठरला सर्वात हॉट..

आज नागपूरला मागे टाकत चंद्रपूर ठरला सर्वात हॉट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-बऱ्याच दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे.त्यामुळे सकाळपासूनच शहरांसह ग्रामीण भागातील रस्ते सामसूम-चिडीचूप झाल्यासारखे दिसून येतात.हल्ली नागरिक दिवसा घराबाहेर न निघता बाजार वा इतर कामासाठी सायंकाळी निघतांना दिसून येत आहेत.त्याचे कारणही तसेच आहे.एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकू लागला आहे.तर पुढील महिन्यात काही खरे नाही,अशी चर्चा गल्लीबोळात नागरिकांमध्ये सुरू आहे.त्यातच काल,शनिवार १९ एप्रिल रोजी राज्यात सर्वात जास्त उष्ण तापमान नागपूरचे होते.तर आज,रविवार २० एप्रिलला नागपूरला मागे टाकत चंद्रपूर सर्वात जास्त हॉट ठरला आहे.काल शनिवारी नागपूरचे तापमान ४४.७ अंश सेल्सिअस होते.तर आज रविवारी नागपूरच्या तापमानात ०.७ अंशाने घट झाली तर चंद्रपूरच्या तापमानात ०.६ अंशाने वाढ  होऊन ४४.६ अंशाची नोंद करण्यात आली आहे.अशातच आज,रविवारी ब्रम्हपुरी,वर्धा,अकोला,अमरावती व नागपूर येथे ४४ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

रखरखत्या उन्हात शेतातच टाकली खाट अन् उपोषणास केली सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसून आज,शनिवार ३० मे पासून सकाळी दहा वाजे जालना...

लाखांदूर-देसाईगंज मार्गावर पेटत्या कारचा थरार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर-देसाईगंज मार्गावरील दुर्गा माता मंदिर पहाडीजवळ भर उन्हात पेटत्या कारचा थरार काल शुक्रवारी घडला.लाखांदूरहून निघालेली कार सोनी-चप्राळ पहाडीजवळ येताच धावत्या...

आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा नदीत बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील वणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, शुक्रवार २९ मे रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!