Sunday, April 19, 2026
Homeदेसाईगंजअवकाळी पावसाने बळीराजा संकटात; नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी.. -ओबीसी काँग्रेसचे...

अवकाळी पावसाने बळीराजा संकटात; नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी.. -ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-अवकाळी पावसाने देसाईगंज तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजा संकटात सापडला आहे.अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.ऐन कापणीच्या हंगामात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या धान पिकाला कोंब फुटण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून हवामानातील सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे.याचा सर्वाधिक फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.अनेकांनी कापलेले धान सुकवण्यासाठी शेतात ठेवले होते,काही ठिकाणी कापणीचे काम सुरू होते; मात्र,अचानक झालेल्या मुसळधार पावसाने हे सर्व धान भिजून गेले.शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेले धान आता मातीमोल होत असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; अशी मागणी ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी केली आहे.
विशेष म्हणजे,दिवाळी संपताच शेतकऱ्यांनी हलक्या धानकापणीला सुरुवात केली होती.शेतकऱ्यांनी दिवाळी कशीबशी साजरी केली आणि लगेच धानकापणी करून आलेला धान बाजारपेठेत विकून उधार,उसनवारी फेडण्याच्या तयारीत असतांनाच अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.देसाईगंज तालुक्यातील धानपिकावर खोडकिडा,करपा,मावा तुडतुडा या कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने आधीच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.त्यातून शेतकरी कसाबसा सावरला असतांनाच अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याने शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी; यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशीही मागणी मनोज ढोरे यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!