- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-मागील गेली दोन ते तीन वर्षांपासून रेती घाट लिलाव प्रक्रिया रखडल्याने अवैध रेती चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.अवैधरित्या रेती चोरी करणाऱ्या चोरट्यांसह अधिकारी,कर्मचारीही मालामाल होत असल्याने अंगाला हळद न लावता रेती चोरांवर पाहिजे त्या प्रमाणात कारवाई होतांना दिसून येत नाही.अशातच भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी अवैध रेती तस्करीवर आळा घातला जावा; यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यांना कारवाईसाठी आदेशित केले आहे.मात्र,भंडारा जिल्ह्याच्या लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५३ वरील मिलन ढाबा येथे वेगळाच प्रकार दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवारी ६ डिसेंबरच्या दुपारी उघडकीस आला आहे.चक्क
अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडले अन् सोडून देण्यात आल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाची अवहेलना करणारा ‘तो’ पोलिस कर्मचारी कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भंडारा जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात अवैध रेती वाहतूक बिनबोभाटपणे सुरू आहे.नदीपात्रातून रेती माफियांकडून रात्रंदिवस रेती उपसा व वाहतूक सुरू असल्याची माहिती संबंधित विभागाला आहे.पण वरची कमाई बंद होण्याच्या भीतीपोटी पूर्णकालीक उपाययोजना केली जात नाही.अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर किंवा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर दिसल्यास रेती माफियाशी मांडवली करून स्वतःचा आर्थिक लाभ करून कसलीही कारवाई न करता वाहन सोडले जाते.या प्रकाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला कर्मचाऱ्यांकडून केराची टोपली दाखविली जात असल्याचे सदर प्रकारावरून दिसून येत आहे. त्यामुळे अशा प्रकारांवर त्वरित आळा घातला जावा; अशी मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.
- Advertisement -

