Monday, April 27, 2026
Homeभंडारानैराश्यातून दारूच्या आहारी गेला अन् स्वतःच संपविले जीवन; विहिरीत उडी घेऊन केली...

नैराश्यातून दारूच्या आहारी गेला अन् स्वतःच संपविले जीवन; विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- लाखनी तालुक्यातील राजेगाव/मोरगाव येथे ४० वर्षीय युवकाने नैराश्यातून घराच्या मागील भागात असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.राजेश प्रल्हाद रहांगडाले (४०, रा. राजेगाव/मोरगाव) असे मृताचे नाव आहे.राजेश हा मजुरीचे काम करीत होता.त्याचे डी.एड.झाले असून, नोकरीच्या शोधात होता.त्याला नोकरी न लागल्याने व लग्न न झाल्याने नैराश्यातून दारूच्या आहारी गेला होता. त्याने सांदवाडीत असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली.बुधवारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

३० वर्षीय महिलेची दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात आज,सोमवार २७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एक भयावह आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली.नात्यातील दिरासोबत विवाह समारंभासाठी...

शासन निर्णयात जरी पोपट पक्षीचा उल्लेख नसेल; तरीही एखाद्याला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवता येणार नाही.. – आता पोपट पक्षांनी नुकसान केल्यास मिळणार भरपाई..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्याने शेतात डाळिंबाची झाडे लावली.पण,अर्ध्याहून अधिकच्या झाडांची फळे ही पोपट पक्षांनी खाऊन नष्ट केली होती.अश्यातच शेतकऱ्याने कृषी विभागास माहिती देऊन पंचनामा...

रखरखत्या उन्हात लग्नसमारंभासाठी प्रवास; बसमध्येच सोडला प्राण.. – आज उष्णतेच्या लाटेचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या स्थितीत नागपूरसह विदर्भाचे तापमान वाढतच आहे.एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली असून अंगाची लाहीलाही होत आहे.एप्रिल महिन्यातच ही स्थिती आहे,तर...

असे कोण करते सांगा? ग्रामसेविकेने शासकीय निधी सरकारी कामासाठी न वापरता चक्क व्याजाने दिले वाटून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासन स्तरावरून गावगाड्याचा सर्वांगीण विकास व्हावा,यासाठी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणावर निधीचे वाटप करण्यात येते.मात्र,काही लोकसेवक मनमर्जिने कामे करून घरचीच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!