Monday, May 25, 2026
Homeदेसाईगंजअखेर  'टी-१४' वाघिणीला केले जेरबंद...- देसाईगंज तालुक्याच्या फरी येथील महिलेला केले होते...

अखेर  ‘टी-१४’ वाघिणीला केले जेरबंद…- देसाईगंज तालुक्याच्या फरी येथील महिलेला केले होते ठार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्यातील फरी येथील महानंदा दिनेश मोहुर्ले नामक महिलेस ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतामध्ये काम करीत असतांना ‘टी-१४’ वाघिणीने हल्ला चढवून ठार केले होते.त्यानुसार गावातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी एकच जमाव करून वाघ,वाघीण व जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्यात यावा; अन्यथा वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचा मृतदेह शविच्छेदनासाठी नेण्यास नागरिकांनी मज्जाव केला होता.त्यानुसार वडसा वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक(ACF) मनोज चव्हाण यांनी ‘रेस्कु टीम’ ला पाचारण करीत वाघिणीची शोध मोहीम राबविली असता आज १७ सप्टेंबर २०२३ रोजी अखेर ६ दिवसांनी ‘टी-१४’ वाघिणीला पकडण्यास वन विभागास यश आले आहे.

सदर वाघीण शिवराजपुर जवळील चिखली रिठ येथील कक्ष क्रमांक-८६६ येथून आज सकाळी ६.४५ वाजेच्या दरम्यान जेरबंद करण्यात आली आहे.सध्याच्या घडीला कोंढाळा-उसेगाव,फरी व इतर जंगल परिसरात ‘टी -२’ वाघिणीचे पिल्ले व इतर वाघांचे वास्तव्य असल्याची माहिती आहे.त्यानुसार ‘टी -२’ वाघिणीचे पिल्ले मोठे झाल्यास जंगल परिसरात स्वतंत्र भ्रमंती करीत असतात. त्यातीलच एक दीड वर्षाची मादी म्हणजेच ‘टी-१४’ वाघिणीने फरी येथील महिलेस शेतात काम करीत असतांना ठार केले होते. त्यानुसार गावकऱ्यांचा रोष पाहून वाघिणीला जेरबंद करून नागपूर येथील गोरेवाडा याठिकाणी नेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!