Monday, December 15, 2025
Homeदेसाईगंजअखेर  'टी-१४' वाघिणीला केले जेरबंद...- देसाईगंज तालुक्याच्या फरी येथील महिलेला केले होते...

अखेर  ‘टी-१४’ वाघिणीला केले जेरबंद…- देसाईगंज तालुक्याच्या फरी येथील महिलेला केले होते ठार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्यातील फरी येथील महानंदा दिनेश मोहुर्ले नामक महिलेस ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतामध्ये काम करीत असतांना ‘टी-१४’ वाघिणीने हल्ला चढवून ठार केले होते.त्यानुसार गावातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी एकच जमाव करून वाघ,वाघीण व जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्यात यावा; अन्यथा वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचा मृतदेह शविच्छेदनासाठी नेण्यास नागरिकांनी मज्जाव केला होता.त्यानुसार वडसा वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक(ACF) मनोज चव्हाण यांनी ‘रेस्कु टीम’ ला पाचारण करीत वाघिणीची शोध मोहीम राबविली असता आज १७ सप्टेंबर २०२३ रोजी अखेर ६ दिवसांनी ‘टी-१४’ वाघिणीला पकडण्यास वन विभागास यश आले आहे.

सदर वाघीण शिवराजपुर जवळील चिखली रिठ येथील कक्ष क्रमांक-८६६ येथून आज सकाळी ६.४५ वाजेच्या दरम्यान जेरबंद करण्यात आली आहे.सध्याच्या घडीला कोंढाळा-उसेगाव,फरी व इतर जंगल परिसरात ‘टी -२’ वाघिणीचे पिल्ले व इतर वाघांचे वास्तव्य असल्याची माहिती आहे.त्यानुसार ‘टी -२’ वाघिणीचे पिल्ले मोठे झाल्यास जंगल परिसरात स्वतंत्र भ्रमंती करीत असतात. त्यातीलच एक दीड वर्षाची मादी म्हणजेच ‘टी-१४’ वाघिणीने फरी येथील महिलेस शेतात काम करीत असतांना ठार केले होते. त्यानुसार गावकऱ्यांचा रोष पाहून वाघिणीला जेरबंद करून नागपूर येथील गोरेवाडा याठिकाणी नेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!